News

शेतकऱ्यांनी मागील वर्षी राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, व्यापारी बँक यांच्याकडून घेतलेल्या पीककर्ज परतफेडीसाठी शासनाने शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

Updated on 02 July, 2021 10:59 AM IST

 शेतकऱ्यांनी मागील वर्षी  राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, व्यापारी बँक यांच्याकडून घेतलेल्या पीककर्ज परतफेडीसाठी शासनाने शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

 यात दिलेल्या मुदतवाढीच्या तारखेपर्यंत म्हणजे 31 जुलै पर्यंत  दर शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड वेळेत केली तर शेतकऱ्यांना व्याजात सवलत मिळेल, अशी माहिती राज्याचे सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

 राज्यातील शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच व्यापारी बँकांमार्फत पीक कर्जाचा पुरवठा केला जातो.

 रिझर्व बँकेच्या नियमानुसार या घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड ही 365 दिवसांच्या मुदतीत करायची असते. जय शेतकरी या मुदतीत कर्जाची परतफेड करतात म्हणजे 30 जून पर्यंत ही मुदत असते. अशा शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ  देऊन त्यांचे  व्याज माफ केले जाते. परंतु राज्यामध्ये सध्या उद्भवलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल व मे महिन्यामध्ये लॉक डाऊन लावण्यात आला होता.

त्यामुळे या कालावधीत शेतकऱ्यांना आलेल्या त्यांच्या मालाच्या विक्री व्यवस्थेतील अडचणी आणि साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अद्याप देय असलेली उसाची रास्त आणि किफायतशीर  किंमत विचारात घेता शेतकऱ्यांच्या हितासाठी ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले. शासनाने  आता 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या वाढीव मुदतीत जे शेतकरी कर्जाची परतफेड करतील त्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ दिला जाईल. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याचेही मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

English Summary: extend period for crop loan
Published on: 02 July 2021, 10:59 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)