यंदाच्या वर्षी मुसळधार पाऊस पडला आहे जे की अपेक्षा ओलांडली असल्याने मराठवाडा मधील ८५७ प्रकल्पात ८४.८२ टक्के एवढ्या प्रमाणात पाणी साचले आहे. जे की या पाणी साठल्यामुळे मराठवाड्यातील खरीप हंगामाचे नुकसान झाले आहे जे की आता या अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाबद्धल अपेक्षा उंचावलेल्या आहेत. जे की या साठलेल्या पाण्याचे म्हणजेच उपलब्ध असलेल्या पाण्याचे कार्य किती आहे.
मराठवाड्यातील सर्व प्रकल्पाचे भवितव्य हे सिंचनावर अवलंबून आहे जे की जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा मधील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी येलदरी, माणार प्रकल्प तुडुंब बसले असून सध्या जायकवाडी सिद्धेश्वर, निम्न तेरणा, पैनगंगा हे प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत. तर दुसऱ्या बाजूला माजलगाव, विष्णुपुरी हे प्रकल्प जवळपास ८९ टक्के पाण्याने भरले आहेत.
सर्वात कमी मांजरा प्रकल्पमध्ये ५४ टक्के पाण्याचा साठा झालेला आहे मात्र मोठ्या प्रकल्पात ९३ टक्के पाणी तर मध्यम प्रकल्पात ८० टक्के पाणी व छोटे म्हणजेच लघु प्रकल्पात ६९ टक्के पाणी भरले आहेत. गोदावरी नदीवरील जे बंधारे आहेत त्यामध्ये ५२ टक्के पाण्याचा साठा झालेला आहे तर तेरणा, मांजरा तसेच रेना नदीवरील बंधाऱ्यात जास्तीत जास्त ७२ टक्के उपयुक्त पाण्याचा साठा झालेला आहे. सतत चा पाऊस म्हणजेच अतिवृष्टी मुळे कीड रोगांच्या आक्रमणामुळे खरीप पिकाचे झालेले नुकसान मराठवाड्यातील खूपच शेतकऱ्यांना झाले आहे.
हेही वाचा:-दसरा सण शेतकरी बांधवांसाठी अन्नसमृद्धीचा, समतेचा आणि एकतेचा उत्सव, वाचा सविस्तर
मराठवाडा मधील सर्वच जिल्ह्यामध्ये सरासरी पेक्षा जास्तच पाऊस पडलेला आहे जे की ४५० मधील २६३ महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. जे की त्यामधील १३१ मंडळामध्ये १ वेळा तर ३८ मंडळामध्ये ३ वेळा तसेच १६ मंडळात ४ वेळा व ३ मंडळात ६ वेळा तसेच ६ मंडळात ६ वेळा अशा प्रमाणे अतिवृष्टी झालेली आहे. गोंदि शिवारामध्ये टेल एंड ला पाणी येत नाही. जे की १५ वर्ष झाले जायकवडीच्या डाव्या मुख्य कॅनॉलची व चाऱ्याची बिकट अवस्था झालेली आहे.
Published on: 03 October 2022, 03:27 IST