News

राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे, यामुळे दहावी आणि बारावीचे निकाल खोळंबले आहेत. हे निकाल लवकरत जाहीर होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. दहावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत तर बारावीचा निकाल १५ ते २० जुलैदरम्यान लागणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

Updated on 10 July, 2020 6:15 PM IST

राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे, यामुळे दहावी आणि बारावीचे निकाल खोळंबले आहेत. हे निकाल लवकरत जाहीर होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. दहावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत तर बारावीचा निकाल १५ ते २० जुलैदरम्यान लागणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

हिंगोली दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना निकालाबदद्लची माहिती दिली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका शैक्षणिक क्षेत्रालादेखील बसला आहे. दहावी, बारावीचे विद्यार्थी  निकालाची वाट पाहत आहेत. निकालाला विलंब झाल्यानं आता पुढील प्रवेशालादेखील उशीर होणार आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळाचा निकाल एकत्रित जाहीर केला जातो. यापैकी मुंबई, ठाणे, पुण्यात, कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे पेपर तपासणीच्या कामाला उशीर झाला आहे.

कोरोनाचा फैलाव सुरू झाला तेव्हा बारावीची परीक्षा पूर्ण झाली होती. दहावीचा भूगोल पेपर कोरोनामुळे रद्द झाला. या पेपरचे गुण सरासरी पद्धतीने दिले जाणार आहेत. शासनानं शाळा महाविद्यालयानं अद्याप परवानगी दिलेली नाही. बारावीचे निकाल ऑनलाईन  जाहीर झाल्यानंतर आठ दिवसांनी गुणपत्रिका दिल्या जातात. त्यासाठी  विद्यार्थ्यांना  महाविद्यालयात यावे लागते. मात्र सध्याच्या परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

English Summary: education minister varsha gaikwad announced date states ssc and hsc board exam result
Published on: 10 July 2020, 06:13 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)