News

राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या एफ आर पी चे दोन तुकडे पाडण्याचा घेतलेला निर्णय हा शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करणारा तर आहेच परंतु त्यासोबत या निर्णयाचा फटका हा विकास संस्थांनादेखील बसण्याची दाट शक्यता आहे.

Updated on 24 February, 2022 10:34 AM IST

राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या एफ आर पी चे दोन तुकडे पाडण्याचा घेतलेला निर्णय हा शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करणारा तर आहेच परंतु त्यासोबत या निर्णयाचा फटका हा विकास संस्थांनादेखील बसण्याची दाट शक्यता आहे.

शासन नियमानुसार शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड वेळेत करता न आल्याने मिळणाऱ्या बिनव्याजी कर्ज सवलती पासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वरील व्याजाचा बोजा वाढत गेल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी तर होईलच परंतु त्याबरोबर विकास संस्थांची  थकबाकी देखील वाढणार आहे.

 एफआरपी आणि शेतकरी

 शेतकऱ्यांचा ऊस साखर कारखान्याला गेल्यानंतर त्यापासून तयार होणाऱ्या साखरेची विक्री करून त्यामधून सगळा खर्च भागवले नंतर राहिलेले पैसे शेतकऱ्यांना ऊस बिलापोटी दिले जायचे.शुगर अॅक्ट 1966 अन्वये ऊस बिलाची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना चौदा दिवसात देणे बंधनकारक आहे.

या बाबतीत या कायद्याची पायमल्ली उघडपणे सुरू होती परंतु शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाल्याने अनिल कायद्यानुसार एफआरपी देण्यास भाग पाडले.यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आलेल्या स्थैर्य मिळू द्यायचे नाही यासाठी साखर कारखानदारांचा सातत्याने प्रयत्न राहिला असूनया माध्यमातूनच एस एम पीचे रूपांतर एफ आर पी मध्ये झाले. आता या एफ आर पी चे तुकडे पाडण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांच्या कंबरडे यामुळे मोडणार आहे.

 अनेक दिवसापासून होतोय कायदा मोडण्याचा प्रयत्न

एकरकमी एफ आर पी चा  कायदा साखरसम्राट राज्यकर्त्यांना अडचणीचा ठरत होता. त्यामुळे तो कायदा मोडण्यासाठी खूप प्रयत्न झाले परंतु त्यात यश येत नाही म्हटल्यावर ऊस लागवडीचा करार करताना शेतकऱ्यांकडून दोन टप्प्यात एफ आर पी  देण्याबाबत लिहून घेतले जाते. त्यालाही शेतकरी संघटनांनी विरोध सुरू केल्यानंतर थेट कायदाच बदलून शेतकऱ्यांना उध्वस्त केल्याची भावना व्यक्त होत आहे.

English Summary: development orgnization affected due to goverment desicion about frp
Published on: 24 February 2022, 10:34 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)