News

राज्यातील बांबू क्षेत्राचा विकास करुन त्या आधारित उद्योगास चालना देण्यासह बांबूच्या मुल्यवर्धनासाठी सुनियोजित प्रयत्न करण्यासाठी “बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान, महाराष्ट्र” ही कंपनी स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्य शासन आणि टाटा ट्रस्टच्या सहकार्याने स्थापन करण्यात येणाऱ्या या कंपनीमुळे राज्यातील बांबूशी संबंधित क्षेत्र सक्षम होण्यास मोठी मदत होणार आहे.

Updated on 08 August, 2018 1:12 AM IST

राज्यातील बांबू क्षेत्राचा विकास करुन त्या आधारित उद्योगास चालना देण्यासह बांबूच्या मुल्यवर्धनासाठी सुनियोजित प्रयत्न करण्यासाठी “बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान, महाराष्ट्र” ही कंपनी स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्य शासन आणि टाटा ट्रस्टच्या सहकार्याने स्थापन करण्यात येणाऱ्या या कंपनीमुळे राज्यातील बांबूशी संबंधित क्षेत्र सक्षम होण्यास मोठी मदत होणार आहे.  

रोजगार निर्मितीसह संघटित बांबू बाजारास चालना देणे, उत्पादन, डिझाईन आणि विक्रीसाठी बांबूचे तीन क्लस्टर्स तयार करणे, बांबूचे मुल्यवर्धन करण्यासह उत्पन्न वाढवणे, घरबांधणी म्हणून बांबूचा वापर करण्यासाठी एक पथदर्शी गाव निर्माण करणे, बांबू अगरबत्ती प्रकल्प राबविणे, मार्केटिंगसाठी वास्तुविशारद व संकल्पचित्रकार यांच्याशी समन्वय, बांबूची गटलागवड करण्यास प्रोत्साहन, तरुण पिढीला बांबूचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणे, बांबूसाठी ज्ञान आणि माहिती केंद्र, लहानउद्योजक आणि व्यवसायासाठी सहाय्य म्हणून कार्य करणे अशी या प्रतिष्ठानची कार्ये राहतील.

राज्य शासनाने यापूर्वी चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली असून 6 ऑगस्ट 2016 रोजी महाराष्ट्र बांबू विकास मंडळ स्थापन केले आहे. बांबूला वाहतूक परवान्यातून सूट देण्यासह बांबू क्षेत्राचा विकास व वृद्धीसाठी धोरणात्मक शिफारशी करण्यासाठी 2017 मध्ये खास समितीची स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसार ना नफा तत्वावर “बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान, महाराष्ट्र” (Bamboo Promotion Foundation, Maharashtra) या कंपनीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य शासन आणि इतर संस्थांकडून प्रारंभिक कॉर्पस फंड घेऊन कंपनी सुरु होईल. तसेच कंपनीसाठी CSR निधीचाही वापर करण्यात येईल. त्यानंतर ही कंपनी स्वत:चे उत्पन्न आणि विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीतून स्वत:ला सुस्थापित करेल. एकवेळच्या 20 कोटी रुपयांच्या माध्यमातून या कंपनीमध्ये शासनाचा सहभाग राहील. तसेच टाटा ट्रस्टने 5 कोटी रक्कमेची हमी दिलेली आहे. भविष्यात इतर भागधारक कंपनीत जसजसे गुंतवणूक करतील त्यानुसार त्यांना सह सभासद म्हणून सहभाग घेण्यात येईल.

राज्यातील वनक्षेत्रापैकी जवळपास 13 टक्के क्षेत्र बांबू व्याप्त आहे. फॉरेट सर्वे ऑफ इंडिया अहवाल-2017 नुसार महाराष्ट्रातील बांबू क्षेत्रात गेल्या तीन वर्षात 4462 चौ.कि.मी.ने वाढ झाली आहे. बांबू क्षेत्राच्या व्याप्ती आणि विस्तारीकरणामध्ये देशामध्ये महाराष्ट्र राज्य वरच्या क्रमांकावर आहे.        

English Summary: Development of Bamboo area in the State Establishment Company Bamboo Promotion Foundation, Maharashtra
Published on: 08 August 2018, 01:07 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)