News

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, महामारी असूनही, देशातील कृषी क्षेत्राने आत्तापर्यंत 3.9% विकास दर नोंदविला आहे.

Updated on 16 May, 2022 9:48 AM IST

एका खाजगी टीव्ही वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कृषी परिषदेला संबोधित करताना केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, महामारी असूनही, देशातील कृषी क्षेत्राने आत्तापर्यंत 3.9% विकास दर नोंदविला आहे. ते म्हणाले, भारत सरकारची शेतीपूरक धोरणे आणि शेतकरी वर्गाच्या मेहनतीमुळे हे शक्य झाले आहे.

काल ओडीसाची राजधानी भुवनेश्वरमध्ये एका खाजगी टीव्ही वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कृषी परिषदेला संबोधित करताना केंद्रीय कृषी मंत्री बोलत होते.  देशाच्या कृषी निर्यातीनेही चार लाख कोटींचा टप्पा गाठला आहे, ही एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे.

देशाची निम्मी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे या वस्तुस्थितीवर प्रकाश टाकून श्री. तोमर यांनी अतिरिक्त मनुष्यबळ आत्मसात करण्यासाठी कृषी आणि संबंधित क्षेत्रातच रोजगार निर्मितीची गरज अधोरेखित केली.

मंत्री तोमर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली सरकार केवळ उत्पादनच नव्हे तर कृषी आणि संबंधित क्षेत्राची उत्पादकता वाढवण्याच्या दिशेने गुंतवणूक, पायाभूत सुविधांची निर्मिती आणि तंत्रज्ञानाच्या हस्तक्षेपाद्वारे काम करत आहे. 

कृषी मंत्र्यांनी सांगितले की, सरकारने कृषी उत्पादनांच्या गुणवत्तेत वाढ करण्याच्या उद्देशाने अनेक पावले उचलली आहेत, ज्यात शेतकऱ्यांना किफायतशीर किमती, बाजारपेठेतील संबंध आणि देशाच्या कृषी उत्पादनांची निर्यात क्षमता सुनिश्चित करणे सुनिश्चित केले आहे.

मंत्री तोमर यांनी यांनी यावेळी, कृषी क्षेत्रातील अनेक संधी तसेच येणाऱ्या काळातील कृषी धोरणांविषयी व संधी विषयी आपले मत मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सध्या  अतिशय उत्तम काम चालू असून देशाचा कृषी क्षेत्राचा विकास दर वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या
भारतातील गव्हाच्या सर्वोत्कृष्ट जाती आणि त्यांच्या विशेषता; जाणुन घ्या याविषयी
फ्लॉवरची शेती म्हणजे लाखोंची कमाई; जाणुन घ्या फ्लॉवर शेतीची शास्त्रीय पद्धत

English Summary: Despite the epidemic, the country's agricultural growth rate is 3.9%; Union Agriculture Minister Tomar
Published on: 16 May 2022, 09:48 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)