News

खानदेशातील शेतकऱ्यांना येणाऱ्या पीकाविषयी चिंता लागली आहे. मकर संक्रांतीनंतर ढगाळ वातावरण तयार झाले. यामुळे रब्बी पिके स्थिती चांगली नाही. उशिरा पेरणी केलेल्या मका पिकांवर ढगाळ वातावरणामुळे लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे.

Updated on 18 March, 2020 4:20 PM IST


खानदेशातील शेतकऱ्यांना येणाऱ्या पीकाविषयी चिंता वाटू लागली आहे. मकर संक्रांतीनंतर सतत ढगाळ वातावरण तयार झाल्याने रब्बी पिकांची स्थिती चांगली नाही. उशिरा पेरणी केलेल्या मका या पिकांवर ढगाळ वातावरणामुळे लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढू लागली आहे. आज पुन्हा एकदा ढगाळ वातावरण तयार झाले आहे. सध्या हरभरा मळणी सुरु आहे, ज्वारीची कापणी सुरू आहे. दरम्यान कापूस आदी पिकांचे दर दबाव कमी आहेत. अशातच प्रतिकूल असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती आहे.

यंदाच्या हिवाळ्यात काही दिवसच थंडी होती. प्रत्येक महिन्यात १८ ते २० दिवस ढगाळ वातावरण राहिले. मागील दोन- तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत असून, उशिराच्या रब्बी हंगामालाही फटका बसत आहे. विषम वातावरणामुळे गहू पक्क होण्याची गती मंदावली आहे. किमान तापमानात मागील दोन दिवस सतत चढ- उतार झाला. धुळे येथील कृषी महाविद्यालयात मागील आठवड्यात किमान तापमानाची नोंद २१ अंश सेल्सिअस पर्यंत झाली होती.  मागील हिवाळ्यात खानदेशात किमान तापमान दोन अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. खादेशात जळगाव, शिरपूर, धुळे, नंदुरबार, ताळोदा, शाहदा, आदी शहरांचा समावेश आहे. 

English Summary: cloudy weather due in khandesh , farmer 's are worried
Published on: 18 March 2020, 04:19 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)