News

लाल मिरचीवर काळे डाग पडू लागले आहेत. याचा परिणाम मिरचीच्या गुणवत्तेवर झाल्यास भावात घसरण होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

Updated on 25 March, 2022 4:00 PM IST

तेलंगणा आणि आंध्र प्रदेशपाठोपाठ आता महाराष्ट्रातील शेतकरी मिरचीवर थ्रिप्स या किडीच्या हल्ल्याने हैराण झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात हवामान बदलामुळे मिरचीवर ब्लॅक थ्रीप्स किडीचा प्रादुर्भाव झाल्याने पिके खराब होत असून, या आक्रमणामुळे मिरचीवर बुरशीचे स्वरूप आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे मिरचीवर बुरशीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळेच आता मिरचीच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्यास भाव पडतील, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.

उत्पादित लाल मिरचीवर काळे डाग पडू लागले आहेत. याचा परिणाम मिरचीच्या गुणवत्तेवर झाल्यास भावात घसरण होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. या पावसाने याआधीच मुख्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. त्यानंतर नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल केला.त्यानंतर शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड करण्यास सुरुवात केली.त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : टरबूज लागवडीमुळे श्रीमंत झाला बळीराजा, दोन महिन्यात झाला लखपती

मिरचीवरील किट आणि बुरशी

कृषी तज्ज्ञ विनोद आनंद सांगतात की, महाराष्ट्रात पावसामुळे ही बुरशी देखील होऊ शकते, जी ब्लॅक थ्रीप्स या किडीमुळे होते. पण बुरशी तर आहेच, पण सध्या जी बुरशी दिसत आहे ती काळ्या थ्रिप्समुळे आहे कारण याआधी. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात ब्लॅक थ्रीप्सच्या आक्रमणामुळे तिथली संपूर्ण मिरचीची शेती उद्ध्वस्त झाली होती त्यामुळे ही काळी थ्रिप्स तिथूनच आली होती.

 

गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील भामरागड, एटापल्ली अहेरी या गावात मिरचीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.शेतकऱ्यांना भाजीपाल्यातूनही अधिक उत्पन्न मिळते. मात्र मिरचीची लागवड करताना सुरुवातीला लाल ठिपके, काळे डाग आणि बुरशी दिसू लागली आहे. क्विंटल उत्पादन होते मात्र आता या रोगाच्या प्रादुर्भावामुळे यंदा उत्पादन ७ ते ८ क्विंटलपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. 

कृषी शास्त्रज्ञ काय म्हणातात

मिरचीचे पीक स्वच्छ ठेवून पीक तणमुक्त ठेवावे, रोग दिसून येताच रोगग्रस्त झाडे उपटून जाळून टाकावीत, जेणेकरून संपूर्ण पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही, असा सल्ला कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना देत आहेत. शोषक किडींचे नियंत्रण यासाठी 10 ग्रॅम ऍसेफेट किंवा 20 मिली फिप्रोनिल 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी लागते. 

कृषी शास्त्रज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले की, मिरची पिकवलेल्या क्षेत्राजवळ दोन-तीन मक्याचे पीक घेतले जाते. ओळीत पेरणी केल्यास हा रोग टाळता येतो.

English Summary: Chilli growers in Maharashtra worried after Andhra Pradesh; Learn why spice is so important
Published on: 25 March 2022, 04:00 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)