News

सध्या राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. यामुळे यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. असे असताना आता एका शेतकऱ्याचे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनं एकनाथ शिंदेंच्या नावे पत्र लिहून आपली व्यथा मांडली आहे.

Updated on 13 September, 2022 5:07 PM IST

सध्या राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. यामुळे यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. असे असताना आता एका शेतकऱ्याचे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनं एकनाथ शिंदेंच्या नावे पत्र लिहून आपली व्यथा मांडली आहे.

तालुक्यात या वर्षी अतिवृष्टीमुळे ओढे, नाले फुटल्याने शेतात पाणी शिरलं. पिकांचं मोठं नुकसान झालं. सरकारर्फे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदत मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा लागली होती. मात्र सेनगाव तालुक्यातील काही ठिकाणच्या शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. पंचनामे झाले मदतीची घोषणा झाली, मात्र या शेतकऱ्यांचे गाव यामधून वगळण्यात आले आहे.

यामुळे या शेतकऱ्याने तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री साहेब, आम्ही बिहारमध्ये राहतो का? असा प्रश्न या शेतकऱ्याने विचारला आहे. या पत्रात सेनगाव तालुक्यात पेरण्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अनेक शेतकरी देशोधडीला लागले. सगळे राजकारणात गुंतले होते. सोबत कृषी विभागालाही विसर पडला.

लम्पीरोग झालेल्या गाई म्हशींचे दूध प्यावे का? दुधाबाबतच्या अफवेला आलाय ऊत...

सेनगाव तालुक्यातील शेतकरी मरणाच्या दारात उभा असताना आपण अनेक मंडळे नाकारली. तालुक्यात सर्व दूर पाऊस असताना आपण तीन मंडळे अतिवृष्टीतून नाकारली. मग आम्ही महाराष्ट्रात नसून बिहारमध्ये राहतो का.? साहेब, अधिवेशनात घोषणा केली. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. मग हे काय खाजगी कंपनीने नाकी नऊ आणले? जगायचे कसे ते सांगा.

साखरेची किमान विक्री किंमत 3100 वरून 3600 रुपये प्रति क्विंटल करण्याची मागणी, कारखान्यांना अतिरिक्त बँक कर्ज मिळेल..

अन्यथा अंगात राहिलेल्या बाकी रक्ताने अभिषेक करून आम्ही आमचे जीव सोडून देऊ. अनुदान द्या. असे म्हटले आहे. यामुळे आता यावर मुख्यमंत्री काय उत्तर देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाप्रकारे अनेक शेतकरी मदतीपासून वंचीत राहिले आहेत. यामुळे त्यांना मदतीची गरज आहे.

महत्वाच्या बातम्या;
कांद्याच्या दरात घसरण, तरीही राज्यात मोठ्या प्रमाणावर लागवड
'काटामारीतून कारखानदार टाकतात ४५८१ कोटींचा दरोडा'
लम्पी रोगानंतर शेतातही आला चायनीज व्हायरस, शेतकऱ्यांनी पिके केली नष्ट

English Summary: Chief Minister Sir, do we live in Bihar? Farmer's letter written in blood goes viral..
Published on: 13 September 2022, 05:07 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)