News

दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे तेथील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच जनजीवन विस्कळीत होऊन शेकडो लोकांचे जीवही गेले आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे भाजीपाल्याच्या दरांनी उच्चांक गाठला आहे.

Updated on 29 August, 2022 4:31 PM IST

दिवसेंदिवस महागाई (inflation) वाढतच चालली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस (Rainy Days) सुरु आहेत. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे तेथील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Damage to crops) झाले आहे. तसेच जनजीवन विस्कळीत होऊन शेकडो लोकांचे जीवही गेले आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे भाजीपाल्याच्या दरांनी (Vegetable rates) उच्चांक गाठला आहे.

टोमॅटो (tomato) 500 रुपये किलो, कांदा (Onion) 400 रुपये किलो आणि बटाटा 120 रुपये किलो. घाबरू नका, हे दर भारताचे नसून पाकिस्तानचे आहेत. सध्या पाकिस्तानात आलेल्या पुराच्या कहरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. श्रीलंकेनंतर आणखी एक शेजारी देश पाकिस्तानला (Pakistan) महागाईचा सामना करावा लागत आहे.

पूर्वी पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रचंड वाढले आणि आता भाजीपाल्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंवर महागाईची आग भडकत आहे. लाइव्हमिंटच्या म्हणण्यानुसार, लाहोर, इस्लामाबादसह अनेक मोठ्या शहरांमध्ये भाज्या आणि फळांच्या किमतीत मोठी वाढ झाल्यानंतर आता पाकिस्तान सरकार भारतातून कांदा-टोमॅटो आयात करण्याचा विचार करत आहे.

संततधार पावसामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले; भाजीपाल्याची आवक घटल्याने दर कडाडले

पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, वापराच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याचे बाजारातील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच किरकोळ बाजारात फळे आणि भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.

आलम म्हणजे रविवारी लाहोरच्या बाजारात टोमॅटोचा भाव 500 रुपये किलो तर कांद्याचा भाव 400 रुपयांवर पोहोचला होता. लाहोरमधील घाऊक व्यापारी सांगतात की काही ठिकाणी घाऊक किंमती 100 रुपयांच्या आसपास आहेत, पण किरकोळ बाजारात जाताना त्याची किंमत चार-पाच पटीने वाढते.

ते म्हणाले की, बलुचिस्तान, सिंध आणि दक्षिण पंजाबमधील पूरस्थितीमुळे भाजीपाला उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून येत्या काही दिवसांत भाजीपाल्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

किंमत 700 रुपये किलोपर्यंत पोहोचेल

घाऊक व्यापारी जवाद रिझवी यांचे म्हणणे आहे की, पूरस्थिती आणि घटते उत्पादन पाहता, जर लवकरच ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर टोमॅटो आणि कांद्याचे भाव येथे 700 रुपये किलोपर्यंत पोहोचतील. जीवनावश्यक भाज्यांमध्ये समाविष्ट असलेल्या बटाट्याचे दरही 40 रुपयांवरून 120 रुपये किलो झाले आहेत.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू होणार नवा वेतन आयोग? जाणून घ्या किती असेल पगार...

वाघा बॉर्डरवरून कांदा-टोमॅटो आणला जाईल

सध्या अफगाणिस्तानातून लाहोर आणि पंजाबच्या इतर शहरांमध्ये तोरखाम सीमेवरून कांदा आणि टोमॅटो येतात, मात्र अपुरा पुरवठा झाल्यामुळे पाकिस्तान सरकार आता भारतातून आयात करण्याची तयारी करत आहे, ती बाघा सीमेवरून केली जाणार आहे.

लाहोर बाजार समितीचे सचिव शहजाद चीमा यांनी सांगितले की, तोरखाम सीमेवरून दररोज 100 कंटेनर टोमॅटो आणि 30 कंटेनर कांद्याची खरेदी केली जाते. यातील दोन टोमॅटो आणि एक कांदा लाहोर शहरात पाठवला जातो, जो मागणीच्या तुलनेत कमी पुरवठा आहे.

का भारत हाच पर्याय आहे

वास्तविक, पाकिस्तान सध्या अफगाणिस्तानमधून कांदा-टोमॅटो आयात करत आहे, जो त्याच्या वापरापेक्षा खूपच कमी आहे. पाकिस्तानकडेही इराणमधून भाजीपाला आयात करण्याचा पर्याय आहे, मात्र हे काम तफ्तान सीमेवरून करावे लागणार असून इराण सरकारने आयात-निर्यात कर वाढवला आहे.

म्हणजेच आधीच भीषण महागाईने त्रस्त असलेल्या पाकिस्तानला येथून आयात करणे महाग होणार आहे. अशा स्थितीत भारत हा त्याच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचे दिसते.

महत्वाच्या बातम्या:
Mileage CNG Car: मारुती सुझुकीच्या या गाड्या देतायेत सर्वाधिक मायलेज; किंमतही आहे कमी
नादच खुळा! १ एकर उसाच्या फडावर आठ मिनिटांत फवारणी

English Summary: Big news! Onion 400 rupees and tomato 500 rupees per kg
Published on: 29 August 2022, 04:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)