News

औरंगाबाद जिल्ह्यात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. यामध्ये दोघांनी विष प्राशन करून तर एकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. यामुळे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे.

Updated on 11 September, 2023 1:50 PM IST

औरंगाबाद जिल्ह्यात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. यामध्ये दोघांनी विष प्राशन करून तर एकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. यामुळे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे.

यामध्ये कन्नड तालुक्यातील हतनूर येथील दिनकर बिसनराव बिडवे (वय 48 वर्षे), फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा येथील कारभारी माणिकराव पाटोळे (वय 55 वर्षे) आणि वैजापूर तालुक्यातील जरूळ येथील अरविंद साहेबराव मतसागर ( वय 43 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे नावं आहे.

दिनकर बिसनराव बिडवे या शेतकऱ्याने शेतातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी (10 सप्टेंबर) रोजी दुपारी दोनच्या दरम्यान उघडकीस आली. त्यांनी शेतातील राहत असलेल्या घरात रविवारी दुपारी आत्महत्या केली. याची माहिती पोलिस पाटील प्रकाश पवार यांनी पोलिस ठाण्यात दिली.

यंदाचा हंगाम शेतकऱ्यांना लाभदायक, फक्त शेतकऱ्यांनी गाळपासाठी ऊस पाठवण्याची घाई करू नये, राजू शेट्टी यांचे शेतकऱ्यांना आवाहन...

दिनकर यांनी नापिकी आणि कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. तसेच पीरबावडा येथील शेतकऱ्याने विषारी औषध घेतले होते. तर, औरंगाबादच्या घाटी रुग्णालायत त्यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. कारभारी माणिकराव पाटोळे (वय 55 वर्षे) असे शेतकऱ्याचे नाव आहे. पावसाअभावी वाया गेलेल्या पिकाच्या नैराश्यान आल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.

पॉलीहाऊसमध्ये भाजीपाला पिकवून शेतकरी होणार मालामाल, सरकार 65% खर्च उचलणार

वैजापूर तालुक्यातील जरूळ येथील अरविंद मतसागर यांचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला आहे. पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. नापिकीमुळे डोक्यावरील कर्जाचा डोंगर कसा फेडायचा या विवंचनेत असलेल्या अरविंद यांनी शनिवारी विषारी औषध सेवन केले होते.

पावसाची पुन्हा एकदा विश्रांती, शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत, जाणून घ्या या आठवड्याचा हवामान अंदाज...

English Summary: Bad situation for farmers! Three farmers committed suicide in Aurangabad on the same day
Published on: 11 September 2023, 01:50 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)