News

पिकांवर कीटकनाशक फवारणीमुळे बाधित होणाऱ्या रुग्णांबाबत विशेष दक्षता घेण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

Updated on 17 August, 2018 12:37 AM IST

पिकांवर कीटकनाशक फवारणीमुळे बाधित होणाऱ्या रुग्णांबाबत विशेष दक्षता घेण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

आवाहनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावरच्या पिकांच्या फवारणीचे काम शेतमजुरांना देताना, शेतमजुरांना सुरक्षाकवच (चष्मे, मास्क, हातमोजे, जॅकेट) उपलब्ध करुन द्यावेत. राज्यामध्ये शेतीपिकांवर कीटकनाशक फवारणी करताना बाधित शेतमजूर / शेतकरी रुग्णांवर उपचार करुन सुट्टी देताना त्यांना किमान 45 दिवस कीटकनाशकाच्या संपर्कात न येण्याच्या लेखी सूचना डॉक्टरांनी द्याव्यात, त्याची एक प्रत स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात पाठवावी. तसेच, शेतकऱ्यांनी कीटकनाशक फवारणी बाधित शेतमजुरांना 45 दिवस फवारणीसाठी बोलावू नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहन याद्वारे करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी त्यांचे शेतावर फवारणी करताना कोणासही विषबाधा झाल्यास अशा व्यक्तींना त्वरित नजीकच्या दवाखान्यात घेऊन जावे व सोबत वापरण्यात आलेल्या कीटकनाशकांची बाटली / कंटेनरही वैद्यकीय अधिकाऱ्यांना दाखवावी जेणेकरुन लवकर उपाययोजना करणे शक्य होईल, असे आवाहन कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार यांनी केले आहे.

English Summary: Appealed by the Department of Agriculture to take special care of those affected by spraying pesticides
Published on: 17 August 2018, 12:37 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)