News

२०२३-२४ पासून सर्व समावेशक पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे प्रति अर्ज केवळ एक रूपया भरुन पिक विमा पोर्टलवर नोंदणी करायची आहे.

Updated on 01 September, 2023 6:38 PM IST

राज्य  

राज्य सरकारच्या पीक विमा योजनेत आजपर्यंत ६६ लाख ५ हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतल्या असल्याची माहिती राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख ३१ जुलैपर्यंत आहे. 

काय आहे एक रुपया पिकविमा योजना?

२०२३-२४ पासून सर्व समावेशक पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे प्रति अर्ज केवळ एक रूपया भरुन पिक विमा पोर्टलवर नोंदणी करायची आहे. उर्वरीत शेतकरी हिश्श्यातील रक्कम सर्वसाधारण विमा अनुदान समजून राज्य शासनामार्फत दिली जाणार आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची घोषणा केली होती.

या पीक योजनेचा लाभ कधी मिळेल?

१. प्रतिकूल हवामानामुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान
२. हंगाम सुरु असताना प्रतिकूल हवामानामुळे झालेले पिकांचे नुकसान
३. पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी उत्पान्नात घट (पावसातील खंड, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, पूर, भूस्खलन)

English Summary: 66 lakh farmers participating in crop insurance scheme Agriculture Commissioner appeal to participate in the scheme
Published on: 19 July 2023, 10:59 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)