News

मुंबई: राज्याच्या साखर आयुक्तांनी महाराष्ट्रातील जवळजवळ चौरेचाळीस साखर कारखान्यांना काळ्यायादीत टाकले आहे.या कारखान्यांनी विविध मार्गांचा अवलंब करीत शेतकर्यां ची फसवणूक केल्याचा ठपका साखर आयुक्तांनी ठेवला आहे.

Updated on 28 September, 2021 10:09 AM IST

मुंबई: राज्याच्या साखर आयुक्तांनी महाराष्ट्रातील जवळजवळ चौरेचाळीस साखर कारखान्यांना काळ्यायादीत टाकले आहे.या कारखान्यांनी विविध मार्गांचा अवलंब करीत शेतकर्‍यांची फसवणूक केल्याचा ठपका साखर आयुक्तांनी ठेवला आहे.

 या काळ्या यादीत समावेश असणाऱ्या कारखान्यांमध्ये जय भवानी गेवराई, किसनवीर भुईंज, लोहारा मधील उस्मानाबाद जिल्हा लोकमंगल माऊली शुगर कारखाना, पैठण मधील शरद कारखाना, लातूरचा पन्नगेश्वरशुगर, तासगाव आणि खानापूर युनिट, नंदुरबारचा सातपुडा तापी, औसा मधील साईबाबा शुगर,वैद्यनाथ कारखाना इत्यादी कारखान्यांचा समावेश या यादीत आहे.

 काही कारखान्यांनी मागील गळीत हंगामातील उसाची एफआरपी अद्याप  शेतकऱ्यांना दिलेली नाही. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना जास्त रकमेचे आमिष दाखवणे आणि नंतर त्यांची फसवणूक करणे,ऊस गाळपास नकार देणे, काही निवडक शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा जातीचे रक्कम देऊन त्यानंतर बहुसंख्य शेतकऱ्यांची फसवणूक करणे अशाप्रकारे काही साखर कारखान्यांकडून फसवणूक केली जात आहे.

 

राज्यातील काही कारखाने शेतकऱ्यांना वेळेवर उसाचे पैसे देतात. त्यामुळे सक्षम कारखाना कोणता आहे शेतकऱ्यांना सहन समजावे, यासाठी राज्यातील सर्व साखर कारखान्याचा लेखाजोखा जाहीर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला होता.

English Summary: 44 suger factory black listed by suger commisioner in maharashtra
Published on: 28 September 2021, 10:09 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)