News

पुणे : अतिरिक्त उत्पादन, किंमतीत सतत होणार बदल आणि सरकारची बदलत जाणारी धोरणे याचा परिणाम म्हणजे देशातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे तब्बल १५ हजार ६८३ कोटी रुपये थकवलेले आहेत.

Updated on 17 September, 2020 4:42 PM IST


पुणे  : अतिरिक्त  उत्पादन, किंमतीत सतत होणार बदल आणि सरकारची बदलत जाणारी  धोरणे याचा परिणाम म्हणजे  देशातील  साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे तब्बल  १५ हजार ६८३ कोटी रुपये थकवलेले आहेत. यातील सर्वात  जास्त रक्कम म्हणजे १२ हजार २२९ कोटी रुपये  हे नुकत्याच संपलेल्या हंगामाचे आहेत.

साधारपणे शेतकऱ्याची ऊसाची बिले  मिळायची प्रक्रिया सतत चालू असते. परंतु मागच्या वर्षी  साखर उत्पादनात मोठ्या प्राणात वाढ झाली परंतु उत्पादनाच्या किंमती मात्र खालीच  राहिल्या. त्यामुळे साखर कारखान्यांकडे  शेतकऱ्यांना द्यायला  पैसे नाहीत. त्यामुळे  उसाचे पैसे थकले आहेत. एकूण ७५ हजार कोटींच्या देण्यांपैकी ६२ हजार कोटींची देणी कारखान्यांनी दिली आहेत.  ही माहिती केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतीच संसदेत दिली.

महाराष्ट्र  आणि उत्तरप्रदेश हे साखर उत्पादनाच्या बाबतीत देशात आघाडीची  राज्ये आहेत. यावर्षीही गतवर्षीच्या तुलनेत ऊसाखालील क्षेत्र वाढलेले आहे. येणाऱ्या  ऑक्टोबर महिन्यात ऊसाच्या नवीन हंगामाला सुरुवात होत आहेत. हंगाम संपेपर्यंत  देशात मोठ्या प्रमाणात ऊसाचे गाळप  होणार आहे. परंतु  यंदा कोरोनामुळे बाजारात मंदी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारखानदारांवर अधिक  भार पडण्याची शक्यता आहे.

English Summary: 15,000 crore farmers exhausted by sugar mills in the country
Published on: 17 September 2020, 04:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)