Health

निरोगी आरोग्यासाठी आपल्या शरीराला पोषक आहाराची आणि जीवनसत्वांची गरज आणि आवश्यकता मोठ्या प्रमाणात असते. आपले शरीर तंदुरुस्त आणि मजबूत राहण्यासाठी दररोज च्या आहारात हिरव्या पालेभाज्या फळे तसेच दूध याचे सेवन असणे गरजेचे असते.भाज्यांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची पोषक तत्वे तसेच आढळून येतात त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या असणे गरजेचे आहे.

Updated on 04 February, 2022 1:50 PM IST


निरोगी आरोग्यासाठी आपल्या शरीराला पोषक आहाराची आणि जीवनसत्वांची गरज आणि आवश्यकता मोठ्या प्रमाणात असते. आपले शरीर तंदुरुस्त आणि मजबूत राहण्यासाठी दररोज च्या आहारात हिरव्या पालेभाज्या फळे तसेच दूध याचे सेवन असणे गरजेचे असते.भाज्यांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची पोषक तत्वे तसेच आढळून येतात त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या असणे गरजेचे आहे.

हिरव्या पालेभाज्या खाणे खूप फायदेशीर आहे:

पालक या भाजीमध्ये अनेक पोषक तत्वे आढळून येतात तसेच अनेक डॉक्टर सुद्धा पालक चे सेवन करण्यास सांगतात. पालक खाणे जरी आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी काही तोटे सुद्धा आहेत. पालक खाणे काही लोकांच्या जीवावर सुद्धा बेतू शकते.हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाणे खूप फायदेशीर मानले जाते. हिरव्या पालेभाज्या मध्ये वेगवेगळी पोषण तत्वे आणि व्हिटॅमिनचे स्त्रोत असतात जे की आपल्या शरीराला खूप फायदेशीर असतात. पालेभाज्या खाल्ल्याने आपल्या शरीराला मुबलक प्रमाणात पोषण तत्वे तसेच आणि व्हिटॅमिन ची कमतरता पूर्ण होते. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये पालेभाज्या खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. तसेच कोरोना सारख्या महामारी मध्ये भाज्यांचे महत्व लोकांना समजले.

पालक भाजी ला सुपरफूड असे सुद्धा म्हटले जाते. पालक भाजीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आढळून येतात. तसेच आजारी व्यक्तीने पालक भाजी चे सेवन केल्यावर तो लवकरात लवकर बरा होतो.पालक भाजी चे आरोग्यदायी फायदे:- पालक मध्ये अनेक पोषक तत्वे आढळतात तसेच पालकामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात सापडते जे की आपल्या शरीराला आवश्यक असते. पालक चे सेवन केल्याने कर्करोगासारख्या आजारापासून आपला बचाव होण्यास मदत होते तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. तसेच रक्तातील हिमोग्लोबिन चे प्रमाण वाढण्यास मदत होते. शरीराचे वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर उपाय आहे तसेच मधुमेह असलेल्या व्यक्तीला पालक सेवन केल्यामुळे मधुमेह नियंत्रणात येतो.

पालक भाजीचे सेवन या व्यक्तींनी तर अजिबात करू नये:- ज्या व्यक्तींना सांधेदुखी चा आजार आहे त्या लोकांनी पालक भाजीचे सेवन अजिबात सुद्धा करू नये. कारण पालक मध्ये ऑक्सॅलिक ऍसिडसह प्युरिन मुबलक प्रमाणात असल्यामुळे सांधेदुखी चा त्रास हा वाढतच जातो. आणि यामुळे अनेक त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच हृदय विकाराचा त्रास असलेल्या व्यक्तींनी सुद्धा याचे सेवन कमी प्रमाणात करावे.जर का तुम्हाला रक्त पातळ होण्याच्या टॅबलेट चालू असतील तर पालक ची भाजी अजिबात खाऊ नये.

English Summary: Spinach is as much a health benefit as it is dangerous health hazard, so people with the disease should avoid it.
Published on: 04 February 2022, 01:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)