Animal Husbandry

भारतात मत्स्यपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. या व्यवसायातही आता नवनवीन तंत्रज्ञान आली आहेत. ज्याचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकते. आज आपण अशाच एका नवीन तंत्रज्ञानाविषयी जाणून घेणार आहोत.

Updated on 29 October, 2022 12:24 PM IST

भारतात मत्स्यपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. या व्यवसायातही आता नवनवीन तंत्रज्ञान आली आहेत. ज्याचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन (production) मिळू शकते. आज आपण अशाच एका नवीन तंत्रज्ञानाविषयी जाणून घेणार आहोत.

विशेष म्हणजे नवीन तंत्राद्वारे मत्स्यव्यवसाय करण्यास सरकार (government) शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. मिश्र मत्स्यशेती तंत्राचा वापर करून शेतकरी सामान्यपेक्षा 5 पट अधिक मासळीचे उत्पादन घेत आहेत.

या तंत्रात तलावात विविध मासे पाळले जातात. तलावातील माशांसाठी पुरेसे अन्न असणे गरजेचे आहे. योग्य प्रमाणात अन्न न मिळाल्यास माशांना जगणे कठीण होईल. तलावात पाण्याचा निचरा करण्याचीही योग्य व्यवस्था असावी. त्यामुळे पावसाचे पाणी माशांना इजा करत नाही.

सर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी! फक्त 35 हजारांची इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; वाचा वैशिष्ट्ये...

महत्वाचे म्हणजे हे काम शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक करावे. बाहेरील मासे तलावात जाऊ नयेत याकडे शेतकऱ्यांनी लक्ष देण्याची नितांत गरज आहे. तसेच तलावातील मासे बाहेर जाऊ शकत नाहीत.

कातला, रोहू आणि मृगल आणि विदेशी कार्प मासे (exotic carp fish) जसे सिल्व्हर कार्प, ग्रास कार्प आणि कॉमन कार्प एकत्रितपणे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.

'या' राशीच्या लोकांच्या मनातल्या इच्छा होणार पूर्ण; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

या व्यवसायातून इतका नफा होईल

मिश्र मत्स्यपालनातून तलावात वर्षातून दोनदा उत्पादन घेता येते. 1 एकरमध्ये मत्स्यशेती करून 16 ते 20 वर्षे उत्पादन मिळवता येते. यातून शेतकरी दरवर्षी 5 ते 8 लाख रुपये कमवू शकतो.

महत्वाच्या बातम्या 
गांडूळ खत निर्मितीसाठी या पद्धतींचा वापर करा; खर्च आणि वेळेची होईल बचत
आनंदाची बातमी! सौर पंप खरेदीवर शेतकऱ्यांना मिळणार 90% अनुदान
कापसाला 12 हजार रुपयांचा हमीभाव द्या; शेतकऱ्यांची मागणी

English Summary: Mixed aquaculture profitable farmers Earnings lakhs rupees
Published on: 29 October 2022, 12:17 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)