Agripedia

भारतात परंपरेने खरीप किंवा रब्बी पिक घेतल्यानंतर उन्हाळा सुरु होण्यापूर्वी जमीन नांगरून तापू दिली जाते.

Updated on 14 March, 2022 12:39 PM IST

भारतात परंपरेने खरीप किंवा रब्बी पिक घेतल्यानंतर उन्हाळा सुरु होण्यापूर्वी जमीन नांगरून तापू दिली जाते. या प्रक्रियेस शास्त्रीय भाषेत साॅईल सोलरायझेशन म्हणतात. पूर्वी बैल नांगराने तर आता ट्रॅक्टर किंवा बैल नांगराने एक ते दीड फुट खोल जमीन नांगरली जाते. उन्हाळ्यात ३५ सेल्सियस पेक्षा अधिक तापमान गेले की १५ सेमी खोलपर्यंत जमिनीचे तापमान वाढते. अशा मशागतीमुळे जमिनीतील बुरशी बऱ्याच प्रमाणात नष्ट होते शिवाय ज्या किडी सुप्त अवस्थेत किंवा कोषावस्थेत जातात त्या नष्ट होतात. जमीन तापल्याने जमिनीतील नत्राचे प्रमाण सहा पट वाढते. शिवाय जमिनीची इलेक्ट्रीकल कंडक्टीविटी वाढते. तसेच जमिनीतील पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांची घनता वाढते. आपोआपच जमिनीची उत्पादकता वाढते. सूर्य प्रकाशाची गरज जशी प्राणी, वनस्पती, मानव यांना असते तशीच ती जमिनीला सुद्धा असते. पिकाच्या वाढीसाठी माती भुसभुशीत असणे आवश्यक असते, कारण त्याशिवाय मुळांची वाढ उत्तम होत नाही. पाऊस पडतो तो कडक जमिनीवरून पटकन वाहून जातो, ओल खोलपर्यंत जात नाही. नांगरलेल्या जमिनीत पाणी खोलवर जिरते, त्यामुळे जमिनीतील ओल टिकून राहते, त्याचा फायदा पिकांच्या वाढीसाठी होतो. जमीन ओली राहिल्याने सेंद्रिय पदार्थांचे विघटन लवकर होते, त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना सहज उपलब्ध होतात. पृथ्वीचं पोट (भूगर्भ) हे एक बँकेचं खातं आहे. ज्यात लक्षावधीं वर्षांची पाण्याची झालेली बचत साठवलेली होती. अगदी पिढ्यान पिढ्या साठत आलेली बचत.

मित्रांनो नांगरणी का केली जाते? याच विषयावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नांगरणी करण्यासाठी कोणती वेळ महत्त्वाची आहे किंवा शेतीची मशागत का करायची असते? सर्वात पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे जमिनीची माती भुसभुशीत करावी लागते आणि नंबर दोन म्हणजे मातीच्या खालच्या थरातील कोश मारावी लागतात. नांगरणी केव्हा करायची सकाळ, दुपार की संध्याकाळी हे आपण पाहणार आहोत.

 

नांगरणी का करतात, नांगरणी करण्याच्या पाठीमागे काही उद्दिष्ट असतात. नेमके कारणं असतात. जमीन भुसभुशीत करणे आणि जमिनी खालची माती पूर्ण वर येईपर्यंत मातीमध्ये अनेक अंडकोष निर्माण झालेल्या असतात आणि ते कोश मारण्यासाठी आपल्याला जमिनीची नांगरणी करावी लागते. हे कोश दुसऱ्या पिकासाठी घातक असतात. म्हणून आपल्याला खालच्या मातीची पलटी करून ती वरती आणावी लागते. त्यामुळे नांगरणी करत असताना केवळ चार ते पाच इंच एवढाच भाग आपण खालचा वर आणि वरचा खाली करत असतो.

अलीकडे काही शेतकरी नांगर जितका खाली लावता येईल, तितका खाली लावण्याचा प्रयत्न करतात. तर नांगरणीच्या मागचे उद्दिष्ट हेच असते, की जमिनीतील कोश मारले जावेत, नंतर कोश जर मारले नाही तर कोशांचे रूपांतर अंड्यामध्ये होते आणि अंड्यांचे रूपांतर अळ्यामध्ये होते. नंतरच्या पिकासाठी हे आपल्याला धोकादायक असते.

म्हणून पहिलं महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे कोश मारणं आणि दुसरं मातीची मशागत करणे, ही दोन महत्त्वाची काम आपल्याला नांगरणीच्या माध्यमातून करावी लागतात. म्हणजेच वरची माती खाली टाकून खालची माती वर करण्याचा प्रयत्न करतो. यालाच आपण जमिनीची नांगरणी असे म्हणतो. हे झालं नांगरणी करण्यामागच शास्त्रीय कारण.

त्याच्याही पलीकडे जाऊन विचार केला तर, नांगरनी कधी करायची हा विचार करतो. नांगरणी साठी वेगवेगळे यंत्र उपलब्ध आहेत. ज्या वेळेस त्यांना वेळ मिळेल त्या वेळेस शेतामध्ये येऊन ते नांगरणी करून जातात. 

धान्य किंवा विविध भाजीपाला पिकांच्या बियाण्यांसह शेतात पेरणीसाठी किंवा बटाटे लावण्यासाठी तथाकथित "बियाणे बेड" तयार करणे आवश्यक आहे, म्हणजे सुकलेल्या मातीचा थर. 

परंतु, आधुनिक कृषीशास्त्राच्या गरजेनुसार केवळ सुपीक माती कुचविणे पुरेसे नाही, त्यातील अनेक थर पेरणीसाठी पुरेसे खोलीत मिसळणे आवश्यक आहे. शिवाय, जेणेकरून एक नांगरट सोल सैल उप पृष्ठभागाच्या क्षितिजाच्या खाली तयार होत नाही, जे पावसाचे पाणी शोषण्यास अडथळा आणते.

हे मातीचे वेगवेगळे थर फिरण्यासाठी आणि फिरण्यासाठी तसेच नांगरण्याच्या विविध पद्धती वापरणार्\u200dया वेगवेगळ्या नांगरांचा वापर करणारे मोठे ढग तोडण्यासाठी आहे. भूमी लागवडीच्या विशिष्ट पध्दतीची निवड ही तण, रोग किंवा कीटक शेतीयोग्य जमिनीवर काय मात करू शकते यावर अवलंबून असते (परिस्थितीनुसार जलाशय फिरवण्याचा पर्याय निवडला जातो), कोणत्या लागवडीची खोली आवश्यक आहे. विशेषतः काही पध्दती माती वारा धूप, बर्फ धारणा आणि वितळलेल्या पाण्याच्या साठ्यापासून वाचवतात.

 

संकलन = सौरव विलास गायकवाड 

English Summary: Why plugging the land this is a scientific reason
Published on: 14 March 2022, 12:36 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)