Agripedia

शेती म्हणजे निसर्गाला कार्बनच्या चक्राला फिरवण्यासाठी झाडांना मदत करणे

Updated on 02 March, 2022 1:44 PM IST

शेती म्हणजे निसर्गाला कार्बनच्या चक्राला फिरवण्यासाठी झाडांना मदत करणे

 

फक्त एवढेच याची आपल्याला जाणीव पण नाही पण जे अनावश्यक किंवा दुय्यम दर्जाची गरज आहे त्यावर आपले खूप लक्ष आहे.म्हणूनच आपली शेती नेहमीच अडचणींनी भरलेली असते. आपली शेती करण्याची पद्धत एक सर्कस-सारखा अवघड तमशा बनली आहे. 

तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल कि सरळ उत्तर का नाही देत एवढे घुमून फिरून का सांगत आहे ?

 एक तर शिकायचे नव्हते म्हणून शेतकरी बनलो 

 आणि म्हणतात वाचा मित्रांनो, तुम्ही अगदी खरे बोलले, तुम्हाला वाचण्याची सवय नाही. पण हेही सत्य आहे की मातीने आपली शक्ती गमावली आहे ज्यावर आपण शेतकरी मजा करत होतो.

 आता आपण शिकलो नाही तर आपण लुटले जाऊ. आणि अपयशी होत राहू.

तर चला हे समजून घेऊ की हे कार्बन चे चक्र काय आहे?

हवेमध्ये कार्बन डायोक्सइड गॅस रूपात जो कार्बन असतो तो प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेतून पाने आत घेऊन शुगर बनवतात आणि द्रव बनते

या प्रक्रियेसाठी, झाडे मुळादवारे मातीतुन पाणी आणि मिनरल्स घेतात, त्यात एक म्हणजे नायट्रोजन ...

 कार्बन संश्लेषण झाले तर बनते कार्बोहायड्रेट / साखर आणि नायट्रोजन संश्लेषण ने बनते (एमिनो ऍसिड) प्रोटीन

  

याच्या प्रमाणाला झाडातील CN रेशो म्हटले जाते

   जेव्हा झाडांचे अवशेष पाने , फांद्या, फुल आणि फळ मातीत कंपोस्ट होतात तेव्हा कार्बन मातीत मिसळतो, तर येथे तो स्नायू बनतो ज्याला आपण सेंद्रिय कर्ब (OC) म्हणतो. अशाप्रकारे हवेमध्ये वायू झाडामध्ये मध्ये द्रव आणि मातीमध्ये स्थायू रूपात राहणारा कार्बन.जास्त सूर्यप्रकाशात ,आग, केमिकल इत्यादी अनेक कारणांमुळे परत हवेत ऑक्सिजन सोबत मिसळून कार्बन डायॉक्साइड बनते.यालाच कार्बनचा चक्र म्हणतात

याच्या असंतुलित होण्यामुळे ग्लोबल वार्मिंग वाढत आहे वातचक्र आणि हवामान प्रभावित झाले आहेत, शेतकरी तीच शक्ती आहे जे मातीला सुपीक बनवून याला थांबवू शकते.मित्रांनो, या कार्बनच्या मदतीने माती सुपीक बनते

मातीच्या सुपीक शक्ती चे दुसरे नाव च organic carbon म्हणजे सेंद्रिय कर्ब आहे , जो चांगल्या उत्पन्नासाठी किमान 2 टक्के असावा.माती ,कार्बन आणि नायट्रोजनचे आदर्श प्रमाण 20-30 आणि 1 असे मानले जाते.

मातीच्या CN रेशो चा प्रभाव सेंद्रिय पदार्थ किंवा खत कंपोस्ट होण्यासाठी सोबत रासायनिक खतांचे चिलेशन खूप महत्वाचे आहे. म्हणजे मातीच्या कार्बन चा सरळ प्रभाव फोटोसिन्थेसिस वर होतो नायट्रोजन तर ७८% हवेत आहे वरून खतात पण सहज उपलब्ध आहे पण कार्बन तर ऑक्सिजन सोबत बांधलेला असतो ज्याला फक्त झाड च वेगळे करू शकतो

     मातीचा कार्बन ज्या मातीत 2.5% पेक्षा जास्त वाढेल, त्या मातीत सोन च पिकेल.जेव्हा झाडांमध्ये

कार्बनची मात्रा कमी असते .

आणि नायट्रोजन मर्यादित असते. फुले निघतात म्हणजे प्रोडक्टीव्ह ग्रोथ होते.

      परिणामी, फळ जास्त प्रमाणात दितात 

त्याचप्रकारे कार्बन आणि नत्राचे प्रमाण झाडांवर येणाऱ्या रोग आणि कीटकांचे नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो कार्बनमुळे गर जास्त बनतो आणि झाडाचे पाने फुले आणि फळे वजनदार सॉलिड बनतात,

आणि नायट्रोजन जास्त असल्यामुळे रस जास्त होतो, त्यामुळे रसशोषक कीटक आकर्षित होतात आणि सोबतच रोगाला आमंत्रित करतात.

हे आपण ठरवायचंय मातीचे आरोग्य कस सांबाळायचे 

जिवाणू संवर्धन कस करायच 

सेंद्रिय कर्ब कसा वाढेल याच्यावर लक्ष केंद्रित झाल पाहीजे

English Summary: What is CN ratio and their importance
Published on: 02 March 2022, 01:44 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)