Agripedia

कांदा लागवड आणि कांद्याच्या उत्पादनात महाराष्ट्राचा नंबर एक आहे. जर आपण काही वर्षांचा विचार केला तर प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यात सगळ्यात जास्त कांदा लागवड व्हायची. परंतु आता महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागांमध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर होत असून शेतकरी चांगले उत्पादन देखील घेऊ लागले आहेत. परंतु बऱ्याचदा शेतकरी बांधवांकडून खर्च खूप जास्त केला जातो त्यामानाने उत्पादन हवे तेवढे निघत नाही.

Updated on 07 October, 2022 10:34 AM IST

कांदा लागवड आणि कांद्याच्या उत्पादनात महाराष्ट्राचा नंबर एक आहे. जर आपण काही वर्षांचा विचार केला तर प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यात सगळ्यात जास्त कांदा लागवड व्हायची. परंतु आता महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागांमध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर होत असून शेतकरी चांगले उत्पादन देखील घेऊ लागले आहेत. परंतु बऱ्याचदा शेतकरी बांधवांकडून खर्च खूप जास्त केला जातो त्यामानाने उत्पादन हवे तेवढे निघत नाही.

यामागे वातावरणातील बदल बऱ्याच प्रमाणात कारणीभूत आहे व ही गोष्ट आपल्या हातात नाही. परंतु कांद्याच्या बाबतीत छोट्या छोट्या परंतु महत्त्वाच्या अशा व्यवस्थापनाच्या बाबी आपल्या हातात असल्यामुळे त्यांच्याकडे बारकाईने लक्ष देऊन

त्या पद्धतीने व्यवस्था करणे गरजेचे असते. त्या अनुषंगाने आपण या लेखामध्ये कांद्याच्या चांगल्या उत्पादनासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याबद्दल माहिती घेऊ.

नक्की वाचा:Crop Tips: महाराष्ट्रातील हवामानात उत्तम येणारी टोमॅटोची 'ही'जात शेतकऱ्यांसाठी ठरेल वरदान, वाचा डिटेल्स

कांदा लागवडीत महत्त्वाच्या गोष्टी

1- सगळ्यात अगोदर महत्त्वाचे आहे कांद्याच्या जातींची निवड-आपल्याला माहित आहेच की,कुठल्याही पिकापासून चांगले उत्पादन हवे असेल तर त्या पिकाच्या सुधारित वाण लागवडीसाठी वापरणे गरजेचे असते. हीच बाब कांदा पिकाला देखील लागू होते.

कारण सुधारित जातींची लागवड केली तर चांगल्या व्यवस्थापनातून दर्जेदार उत्पादन हातात येते व अशा जाती कीड व रोगांना कमी प्रमाणात बळी पडतात व आपला होणारा उत्पादन खर्च वाचतो.

जर आपण उदाहरण घ्यायचे झाले तर कांद्याच्या बसवंत 780 ही जात उत्पादनाच्या दृष्टीने खूप चांगली असून लागवडीनंतर 100 ते 110 दिवसांत उत्पादन हातात येते. जर चांगले व्यवस्थापन राहिले तर या जातीपासून प्रति हेक्‍टरी 250 ते 300 क्विंटल उत्पादन येऊ शकते.

जर आपण दुसऱ्या जातीचा विचार केला तर एम 53 ही देखील जात चांगली असून महाराष्ट्रातील जात बऱ्यापैकी शेतकरी बांधव लावतात. या जातीपासून देखील चांगले उत्पादन मिळते. लागवडीनंतर 100 ते 150 दिवसांत तयार होते. जर आपण प्रति हेक्‍टरी विचार केला तर 200 ते 250 क्विंटल उत्पादन देण्याची क्षमता या जातीत आहे.

नक्की वाचा:Wheat Crop: येतोय रब्बी हंगाम आता गहू पेरायचा आहे ना? तर फायदेशीर ठरतील गव्हाच्या या तीन जाती,वाचा डिटेल्स

2- हवामान आणि माती आहे खूप गरजेची- जर आपण कांदा लागवडीच्या बाबतीत विचार केला तर कांदा लागवडीतील प्रगतिशील शेतकरी असे म्हणतात की कांदा लागवडीसाठी ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा काळ सर्वात योग्य असतो.

या कालावधीमध्ये कांदा लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीची पूर्वमशागत करून सेंद्रिय खतांचा योग्य प्रमाणात वापर करणे गरजेचे आहे.

या सोबतच ज्या जमिनीत कांदा लागवड करणार ती जमीन पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी. क्षारयुक्त किंवा पाणथळ जमिनीमध्ये कांदा लागवड करू नये.आपल्याकडे प्रामुख्याने तीन हंगामामध्ये कांदा लागवड केली जाते. एक खरीप हंगामामध्ये लाल कांदा, रब्बीमध्ये रांगडा आणि उन्हाळी हंगामात देखील कांद्याची लागवड होते.

3- खतव्यवस्थापन गरजेचे- कांदा पिकापासून चांगले उत्पादन मिळवायचे असेल तर खतांचा समतोल वापर करणे गरजेचे असून जास्तीचा वापर टाळावा.

कारण जास्तीचा वापर हा कांदा पिकासाठी नुकसानकारक ठरू शकतो. खतांचा समतोल वापर केल्यामुळे पिकांना आवश्यक पोषण मिळते आणि जमिनीचा देखील समतोल साधला जातो व उत्पादनात वाढ होते. कांद्याची सेंद्रिय शेती करत असताना गांडूळ खत आणि जीवामृत वापरून कांद्याचे खूप चांगले उत्पादन घेता येते.

4- पाणी व्यवस्थापनावर द्या लक्ष- कांद्याचे पाणी व्यवस्थापन करताना आवश्यक तेवढ्याच पाण्याचा वापर करणे गरजेचे असून ठिबक सिंचनाचा वापर कराल तर खूप महत्त्वाचे ठरते. पाटपाणी देत असाल तर कांदा मध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.

5- काढणी करताना ही काळजी घ्या- जर आपण कांदा पिकांचा विचार केला तर कांद्याच्या बहुतेक जाती लागवडीनंतर 90 ते 110 दिवसांचा दरम्यान काढणीस तयार होतात.

कांदा पीक काढताना पक्व झाल्याशिवाय काढू नये. असे केल्यास त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. जर आपण सध्याचा विचार केला तर पेरणीच्या तीन ते साडे चार महिन्यात कांदा काढला पाहिजे.

कांदा काढणी केल्यानंतर तीन ते पाच दिवस शेतात मोकळा पडू देणे गरजेचे आहे. जेव्हा कांद्याची पात पिवळी पडते म्हणजेच बऱ्याच ठिकाणी त्याला कांदापात गळणे असे देखील म्हणतात. त्यावेळेसच कांदा काढण्याचे काम सुरू करावे.

नक्की वाचा:Crop planning: गव्हाच्या लागवडीतून मिळवायचे असेल बंपर उत्पादन तर नक्कीच घ्या 'या' गोष्टींची काळजी, मिळेल फायदा

English Summary: this is small but so important tips is useful for growth production of onion crop
Published on: 07 October 2022, 10:34 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)