Agripedia

संग्रामपूर जि. बुलढाणा येथे तहसील कार्यालयावर पूरग्रस्त शेतक-यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी संग्रामपूर, जळगाव जामोदसह परिसरातील तालुक्यामध्ये ढगफुटीमुळे आलेल्या पुरामुळे शेतक-यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून. परिसरातून शेकडो जनावरे पुरात वाहून गेले आहेत.

Updated on 01 August, 2023 6:01 PM IST

संग्रामपूर जि. बुलढाणा येथे तहसील कार्यालयावर पूरग्रस्त शेतक-यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी संग्रामपूर, जळगाव जामोदसह परिसरातील तालुक्यामध्ये ढगफुटीमुळे आलेल्या पुरामुळे शेतक-यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून. परिसरातून शेकडो जनावरे पुरात वाहून गेले आहेत.

हजारो एकर शेतजमीन कातरली असून पिके वाहून गेल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.शासनाने तातडीने पंचनामे करून जमीन खरडून गेलेल्या शेतक-यांना एकरी १ लाख व पिकासाठी एकरी ५० हजार रूपये नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली.यावेळी प्रकाश पोपळे, प्रशांत डिक्कर, पूजा मोरे, गजानन बंगाळे पाटील यांचेसह स्वाभिमानीचे पदाधिकारी व तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.

यावेळी राजू शेट्टी म्हणाले, सरकार नेहमीच घाेषणा करते परंतु मदत कधीच मिळत नाही असा अनुभव आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या लाेकांना तातडीने मदत मिळावी यासाठी सरकारचे डाेकं ठिकाणावर आणायचे आहे. त्यासाठीच आजचा माेर्चा आहे असे बुलडाणा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) नेते राजू शेट्टी यांनी माध्यमांशी बाेलताना नमूद केले. शेट्टी यांनी अतिवृष्टीग्रस्त भागात भेट दिली.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता पीएम किसान योजनेचा अजून एक हप्ता वाढणार? माहिती आली समोर....

सरकारने शेतकऱ्यांच्या (farmer) तोंडाला मदतीच्या नावावर पाने पुसली आहेत. सरकार कधीच मदत करत नसतं, सरकार फक्त मदतीची घोषणा करत असतं. त्यामुळे या अतिवृष्टीग्रस्त लोकांना तात्काळ मदत देण्यात यावी अन्यथा आम्ही सरकारच्या उरावर बसू असा इशारा त्यांनी दिला.

शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील बीआरएसचा झेंडा हाती पकडणार? केसीआर यांचा उद्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर..

पालकमंत्री किंवा लोकप्रतिनिधी यांना लोकांचं काही देणंघेणं नाही जनता मेली काय आणि राहिली काय यांना काही देणे घेणे नाही ते फक्त राजकारणात मश्गूल आहे दुसऱ्याचा पक्ष फोडण्यात मश्गूल आहेत अशी टीका शेट्टी (raju shetti) यांनी सत्ताधा-यांवर केली.

लोकप्रतिनिधी यांना लोकांचे काही देणंघेणं नाही जनता मेली काय आणि राहिली काय, राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक
पूरग्रस्तांसाठी कंबर कसून उभे आहोत, स्वाभिमानी कडून मदतीचा हात..

English Summary: The government that cheated the farmers will be brought to the spot
Published on: 01 August 2023, 06:00 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)