Agripedia

आपल्या शेत जमिनीचे आरोग्य जर उत्तम असेल तर त्यातील जीवाणू आणि पिकांचे आरोग्य उत्तम राहते त्याच बरोबर माणसाचेही आरोग्य उत्तम राहते. त्यामुळे आपल्या जमिनीच्या आरोग्यास महत्त्व देणे ही काळाची गरज आहे

Updated on 03 January, 2022 2:58 PM IST

राज्यातील विभागानुसार प्रत्येक हंगामात विविध पिके घेण्यात येतात. त्यामध्ये तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य, भाजीपाला पिके, फूल पिके, फळपिके यांचा समावेश होतो. पिकांची पेरणी करताना ज्या पिकास आपल्याला हमखास आणि चांगला बाजारभाव मिळेल याचा विचार प्रथम करून पिकांची पेरणी करताना सर्व प्रक्रिया मध्ये पिकांचा फेरपालट या बाबींचा विचार करणे आवश्यक आहे.

त्यामुळे ज्या पिकांना चांगला बाजारभाव मिळतो.आता आपले चुकतेय कोठे! आपन शेती मध्ये तेच ते पिके एकाच क्षेत्रातून घेतो त्यामुळे जमिनीचा कस हमखास कमी होऊन तिची उत्पादनक्षमता कमी झाली की पिकांचे उत्पादन कमी मिळते. त्याचबरोबर पिकांवर काही रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वाढतो व पीक त्यास हमखास बळी पडते. पर्यायाने कमी उत्पादन पदरात पडते. यासाठी पिकांची फेरपालट करणे अत्यंत गरजेचं आणि महत्त्वाच आहे.

त्याचप्रमाणे जादा उत्पादन मिळवण्यासाठी जमीन मुळात उत्पादनक्षम असणे गरजेचे आहे. जमिनीस दोन ते तीन वर्षातून एका वेळेस सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा पुरवठा केल्याने पिकांची उत्पादकता मिळत नाही. तसेच जमिनीकडून पिकांचे चांगले उत्पादन, मिळण्यासाठी जमिनीला वरचेवर गरजेनुसार आणि पिकांच्या वाढीच्या अवस्थेप्रमाणे सेंद्रिय, रासायनिक आणि जैविक खतांचा पुरवठा करणे आवश्यक असते.

याच सोबतच पिकांचे योग्य प्रकारे नियोजन करून म्हणजेच योग्य पद्धतीने पिकांची फेरपालट करून जमिनीचे आरोग्य टिकवणे आवश्यक आहे. जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी पिकांची फेरपालट करताना पुढील बाबी विचारात घेणे गरजेचे आहे.

वर्षातून किमान एकदा जमिनीची मशागत करून एक महिना जमीन उन्हात तापू देणे

जमिनीची शक्यतो हिवाळयात मशागत करून म्हणजेच खोलगट नांगरट करून मातीचा खालचा थर पृष्ठभागावर आणि पृष्ठभागावरील माती खोलीवरील थरात केली म्हणजेच जमिनीची उलथापालथ केली असता, जमिनीमधील खोलवर असलेल्या किडींचे कोष उघडे पडतात. पक्षी हे कोष खातात. हे कोष उन्हात उघडे पडल्यामुळे त्यातील किडींचे अवशेष मरतात आणि एकात्मिक कीड नियंत्रणाद्वारे किडींचा बंदोबस्त होतो.

याशिवाय मातीचे कण उन्हामुळे तापतात आणि पावसाच्या पहिल्या सरीबरोबर मातीच्या कणांचे विघटन होऊन त्यातील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात. यासाठी वर्षातून एकदा जमीन किमान एक महिना चांगल्या कडक उन्हात तापवणे गरजेचे आहे. पिकांची फेरपालट करत असताना ही बाब प्राधान्याने लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

वर्षातून किमान एकदा हिरवळीच्या खतांची पिके घेणे

खरीप हंगामाच्या सुरुवातीला आणि रब्बी हंगामाच्या सुरुवातीस किंवा हंगामाच्या शेवटी आणि उन्हाळी हंगामाच्या सुरुवातीस किंवा पाण्याच्या उपलब्धतेनुसार ताग, धंचा, चवळी यासारखी जलद वाढणारी कालावधीत भरपूर वाढ होऊन हिरवा पाला देणारी हिरवळीच्या खतांची पिके जमिनीमध्ये घेणे आवश्यक आहे. दोन हंगामाच्या मधे पहिल्या पिकांची काढणी झालेली असते आणि पुढील हंगामाच्या पिकांची पेरणी व्हावयाची असते

एवढया कालावधीत हिरवळीच्या पिकांची पेरणी केल्यास आणि हिरवळीचे पीक फुलावर येण्यापूर्वी जमिनीत गाडल्यास मोठया प्रमाणात सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळले जातात. त्यामुळे जमिनीचा पोत आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते. तसेच जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंना खाद्य मिळाल्याने त्यांची संख्या वाढते आणि उपलब्ध नसलेली अन्नद्रव्ये पुढील पिकांना उपलब्ध होतात.

आंतर पीक पद्धतीचा किंवा मिश्रपीक पद्धतीचा अवलंब करणे

लागवड करण्यात येणा-या म्हणजेच पेरणी करण्यात येणा-या सर्व पिकांची वाढ व त्यांची अन्नद्रव्ये घेण्याची पद्धत एकसारखी नसते. काही पिकांची मुळे तंतुमय असतात व ती जमिनीच्या पृष्ठभागापासून जास्तीत जास्त ९० सें.मी. खोलीपर्यंत जातात. तेवढयाच खोलीवर अन्नद्रव्ये शोषून घेतात. त्यामुळे शेतामध्ये पिकांची पेरणी करताना एकाच प्रकारच्या पिकांची पेरणी न करता दोन किंवा अधिक वेगवेगळया पद्धतीने मुळांची वाढ होणा-या पिकांची म्हणजेच तृणधान्यांसोबत कडधान्य किंवा गळीत धान्य पिकांची आंतर पीक पद्धतीने किंवा मिश्रपीक पद्धतीने शिफारशीनुसार पेरणी करावी.

एकाच क्षेत्रात दोन हंगामांत एकाच वर्गातील पिके न घेता भिन्न वर्गातील पिकांची पेरणी करणे

तृणधान्ये पिके हवेतील नत्र शोषून घेत नाहीत तर कडधान्ये पिके हवेतील नत्र शोषून घेतात, गळीत धान्यापैकी भुईमूग हे पीक हवेतील नत्र शोषून घेते, जमिनीची सुपिकता टिकवण्यासाठी पिकांची फेरपालट करताना हवेतील नत्र शोषून न घेणा-या पिकांनंतर हवेतील नत्र शोषून घेणा-या पिकांची लागवड करावी. त्यामुळे जमिनीतील प्रमुख अन्नद्रव्यांची पातळी कायम राखली जाऊन पिकांची वाढ चांगली होते.

जमिनीची सुपिकता टिकवण्यासाठी जमीन सतत वापर अवस्थेत ठेवणे

जमीन ही भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मानी बनलेली आहे. त्यामधील रासायनिक आणि जैविक गुणधर्मानी बनलेली आहे. त्यामधील रासायनिक आणि जैविक क्रिया जमिनीमध्ये हवा आणि पाणी यांचे सारखे प्रमाण असताना मोठया प्रमाणात होतात.

जमिनीतील सर्व पोकळया पाण्याने भरल्यास जीवाणू गुदमरतात आणि त्यांची क्रिया थांबते. तर सर्व पोकळया हवेने भरल्यास जमिनीत ओलावा नसल्याने जीवाणू मरतात. या दोन्ही प्रक्रियेत पिकांना अन्नद्रव्य उपलब्ध न झाल्यामुळे पिकांची वाढ होत नाही. यासाठी जमिनीत हवा आणि पाणी यांचे प्रमाण सारखे असणे गरजेचे आहे. पिकांची चांगली वाढ होणे व जादा उत्पादकता मिळवण्यासाठी जमीन सतत वापर अवस्थेत ठेवावी.विचारांची दीशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल

 

 

milindgode111@gmail.com

Milind j gode

English Summary: Soil health and rotation
Published on: 03 January 2022, 02:58 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)