Agripedia

गेल्या 15 दिवसापासून महाराष्ट्रातील कापूस उत्पादक पट्टयात सर्वत्र पाऊस पडत राहिला,

Updated on 27 September, 2022 8:09 PM IST

गेल्या 15 दिवसापासून महाराष्ट्रातील कापूस उत्पादक पट्टयात सर्वत्र पाऊस पडत राहिला, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी गेल्या 15/20 दिवसापासून रस शोषण करणाऱ्या किडीं विशेतः थ्रीप्स , मावा, पांढरी माशी, तुडतुड्या मुळे हैराण झालेले होते. त्यामुळे पाती गळ, चुराडा मुरडा, कापसाची वाढ न होणे आणि लाल्या रोग या रोगांना कापसाचे पीक बळी पडले. विशेषतः इल्लीगल 3जी, 4जी कापूस लाल पडले.15 दिवसात उपटून टाकावे लागतील अशी परिस्थिती या कापसाची झाली आहे.

शेतकरी  आपल्या शेतात बीटी कापसाच्या शेतात बोन्ड अळीने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे,Bt cotton fields in our fields are heavily infested with bollworm, असा बाऊ केला जातआहे.

मित्रा, आपल्या शेतात बीटी कापसाच्या शेतात बोंड अळीने मोठ्या शेतकऱ्यांच्या शेतात बीटी कापसाच्या शेतात बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे, असा बाऊ केला जात आहे.

आजची अमावस्या कापूस उत्पादकांना भारी! जाणून घ्या सविस्तर

चांगले निरीक्षण असे मत आहे की, जी नॉटी ची कापसाची झाडे तुमच्या शेतात बीच्या बीच्या झाडावरही आहे पण बीच्या झाडावरही बीबीत अळी प्रतिबंधक जीवापान, झाडाची झाडे अळीने खाल्ले तरी मरेल, कारण 85/90 दिवस बीटीचेन्स प्रतिकार. कार्यक्षम असतात.

पण जी नॉनटीचे झाड शेतात आहेत बीची अळी मरणार

 

नाही, आणि अशा नॉन बीटीच्या झाडात अळी प्रतिबंधक जीन्स नसल्यामुळं त्या कापसाच्या झाडावर कापूस उपटें पर्यन्त अळी पडतच राहणार आहे. कारण सरकारच्या नियमानुसार सर्वच कंपन्यांनी 25 ग्रॅम नॉन बीटी बियाणे 450 ग्रॅम बीटीच्या बियाण्यातच मिक्स करून दिलेले आहे, आणि ती नॉन बीटीची झाडं आपल्या शेतात विखुरलेल्या स्वरूपात आहेत, शेतात चांगले निरीक्षण करा,तुम्हीच मला सांगाल सर तुम्ही म्हणतात ते खरे आहे.दुसरी एक महत्वाची गोस्ट किटकनाशके विकणाऱ्या

कंपन्या, त्यांचे प्रतिनिधी, अप्रामानिक व्यावसायिक यांनी अफवा पसरवल्या मुळे , आणि आपल्याच कंपनीची किटक नाशके विक्री व्हावी म्हणून शेतकऱ्यांची दिशाभूल करून, एकाच वेळेस 5/6 मॉलिक्युल फवारणीचा सल्ला दिला जात आहे, तेव्हा 2 पेक्षा जास्त मॉलिक्युल एकत्र करून फवारणी करू नका, सरकारचा कृषी विभाग एकच मॉलिक्युल सांगते पण 2 औषदाची कॉम्बि किंवा कॉकटेल केल्याशिवाय अळी मरत नाही असा माझा अनुभव आहे.शेतकऱ्यांना भीती दाखवून अफवा पसरवून नको ती

आणि नको तितकी किटकनाशके त्यांच्या माथी मारली जात आहेत. बाजारात शेतकरी नागवला जात आहे. लूट चालू आहे, अव्वाच्या सव्वा किमती लावून शेतकऱ्यांना उधारीवर दिल्या जात आहेत, आणि नाईलाजास्तव शेतकरीही घेत आहेत, शेतकऱ्यांचाही नाईलाज आहे कारण, शेतकऱ्यांच्या आर्थिक दैनावस्थेमुळे,सावकार ,बँका, त्यांना कर्ज द्यायला तयार नाहीत.दहाही दिशेने शेतकऱ्याला ओरबडन्याचे काम देश भरात सुरु आहे, त्याने पिकवलेल्या मालाला भाव नाही, उत्पादन खर्च सुद्धा

निघत नाही उलट दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढतच चालला आहे, आणि त्यामुळेच देशभरात शेतकऱ्यांना शेवटचा,मार्ग म्हणजे आत्महत्त्या अवलंबावा लागत आहे. असो थोडे विषयांतर झाले, आपण आपल्या विषयाकडे वळू.मित्रानो पूर्व मोसमी कापूस ज्यांनी 1 जून पूर्वी लावला असेल त्या कापूस पिकाची फवारणी संपली आहे. मात्र ज्यांची लागवड 10 जुन नंतरची आहे आणि कोरडच्या कापसाला अजून 2 वेळा फवारणी करावी लागेल. आजपासून येणारे 3/4 दिवस म्हणजे 26 ते 30 सप्टेंबर पर्यंत कापूस या पिकाला अळी नाशकांची

फवारणी करून घ्यावी, व पुन्हा 8 ते 12 ऑक्टोबर दरम्यान 1 शेवटची फवारणी करून घ्यावि. आता डोमकळी दिसायला सुरुवात होईल. आणि जी अळी दिसेल ती नॉन बीटी च्या झाडावरच दिसेल.आता कापूस लागवड करून (कोरड ) 90 दिवस होत आलेत आणि बीटी ची प्रतिकार क्षमता 80/85 दिवसापेक्षा जास्त नसते, त्यामुळे सप्टेंबर महिन्यात येणारा सेंद्रीचा अटॅक मोठा असेल पण त्यासाठी घाबरून जाण्याचे कारण नाही, मी सांगतो त्या उपाय योजना करा , फवारणीच्या तारखा टळू देऊ नका .काटेकोर पने नियोजन करा सेंद्री अळी वर आपण निश्चित मात करू.

 

प्रा.दिलीप शिंदे सर

भगवती सीड्स,चोपडा

जिल्हा जळगाव.

भ्रमणध्वनी 9822308252

English Summary: Read Agriculture and September Sarvapitri Amavasya
Published on: 27 September 2022, 07:57 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)