Agripedia

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजावरून येत्या खरीप हंगामात पाऊस मुबलक प्रमाणात पडणार आहे. हवामान खात्याच्या या माहितीने सुखावणाऱ्या बळीराजांने खरीप हंगामाची सुरुवात केली आहे.

Updated on 02 June, 2021 1:52 PM IST

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजावरून येत्या खरीप हंगामात पाऊस मुबलक प्रमाणात पडणार आहे. हवामान खात्याच्या या माहितीने सुखावणाऱ्या बळीराजांने खरीप हंगामाची सुरुवात केली आहे. खरीप हंगामाध्ये तूर महाराष्ट्रातील मुख्य पिकांमध्ये मोडलं जाते. तुरीचे पीक हे कमी पावसाच्या ठिकाणी आणि पाणी मुबलक उपलब्ध आहे अशा ठिकाणी घेतलं जाणारे पीक आहे.

दरवर्षी विक्रमी उत्पन्न महाराष्ट्र राज्यामधून घेतले जाते आणि तुरीला(pigeon pea)खूप चांगला बाजारभाव सुद्धा मिळतो. त्यामुळे कमी पाऊस असलेल्या किंवा पाण्याची उपलब्धता कमी असलेल्या मराठवाडा, विदर्भ, खानदेश भागात तूर प्रमुख्याने घेतली जाते. कारण तूर कमी पाण्याला तग धरून राहते तसेच कमी मेहनतीमध्ये चांगला नफा मिळवून देते. पण बऱ्याच शेतकऱ्यांना नवीन वाण व खत नियोजन योग्य पद्धतीने कसे करता येईल त्याबद्दल माहिती नसते. याविषयीची माहिती करून देणे महत्वाचे आहे. आज आपण याविषयीची माहिती घेणार आहोत. तर चला पाहूयात तूर लागवडीचे तंत्रज्ञान.

जमीन आणि हवामान- तुरीच्या लागवडीसाठी आधी आपण जमिनीची माहिती घेऊ. तुरीसाठी जमीन ही पाण्याचा उत्तम निचरा करणारी, मध्यम ते भारी जमीन फार चांगली. शक्यता चोपण जमिनीमध्ये तूर लागवड करू नये. त्या जमिनीतून भरघोस उत्पन्न निघत नाही. पोयट्याची जमीनही लागवडीसाठी चांगली आहे. या पिकाला २१ ते २७ सेल्सिअस डिग्री तापमान मानवते. 

पूर्वमशागत-  उन्हाळ्यामध्ये चांगली खोल नांगरटी करून घ्यावी. तापलेल्या जमिनीमुळे त्यातील किडी, अंडी व कोप इ. नष्ट होतात त्याचबरोबर सच्छिद्रता वाढते. हेक्टरी १०-१५ टन कुजलेले शेणखत घालून घ्यावे.

वाण- लागवड करताना कोणते वाणांची पेरणी करावी याविषयी पण आपण काळजी घेतली पाहिजे. बाजारात अनेक कंपनीचे वाण असतात. त्यातील कोणता चांगला आहे याची निवड करून आपण त्याची पेरणी आपल्या शेतात करावी. खाली काही वाणांचे नाव दिले आहेत, शेतकरी या वाणांची पेरणी आपल्या शेतात करत असतात.  वाणा सोबत किती दिवसात आपल्या उत्पन्न मिळते याचीही कल्पना दिली आहे.

आय.सी.पी.एल-११२५५, आय.सी.पी.एल-२०३४०, आय.सी.पी.एल-२०३३८ (९०-१०० दिवस) बी.डी.एन.-७११ (१५०),  फुले-टी ००१२ (१३५-१५०), बी.डी.एन.-७१६ (१६०-१६५),  आय.सी.पी.एल- ८७ (१२० दिवस),  ए.के.टी.- ८८११ (१४० दिवस),  बी.एस.एम.आर.- ८५३ (१६० दिवस), बी.एस.एम.आर.- ७३६ (१७० दिवस),  विपुला (१४५-१६० दिवस) हे सुधारित वाण आहेत आणि उत्पन्न ही चांगले आहे.

हेही वाचा :वाचा ! पिकांमध्ये झिंकचे काय असतं कार्य

पेरणी/लागवड- मॉन्सूनचा पाऊस वेळेवरती झाला तर जूनच्या तिसऱ्या-चौथ्या आठवड्यात रान वापश्यावर आले की पेरणी करावी. उशिरा पेरणी करु नये. जर उशिराने आपण पेरणी केली तर उत्पन्नामध्ये घट येते.  सलग पिकांसाठी साधारणता ४५ x १० सें.मी व अधिक कालावधीच्या वाणांसाठी ६० x २० से.मी अंतर ठेवावे. विशेषता हैद्राबाद येथील इक्रिसॅट (आंतरराष्ट्रीय अर्धकोरडवाहू पीक संशोधन संस्थेने संशोधित केलेल्या कमी उंचीच्या वाणांची लागवड सघन पद्धतीने फक्त ३० x १५ सें.मी करता येते. सरासरी १०-१५ किलो बियाणे लागवडीच्या अंतरावरती लागते.

बीजप्रक्रिया-  पेरणीपुर्वी १-२ ग्रॅम कार्बेन्डेंझीम व २ ग्रॅम थायरम किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा + २५ ग्रॅम रायझोबियम प्रती किलो बियाणाला गुळाच्या थंड द्रावणात मिसळून लावावे. येथे एक गोष्ट लक्षात असू द्या.   जैविक औषधे ही जैविक खतांबरोबर दिली तर काही होत नाही, पण रासायनिक खतांबरोबर एकत्रित देऊ नयेत.

खत व्यवस्थापन- सलग पीक पध्दतीमध्ये २५-३० किलो नत्र, ४०-५० किलो स्पुरद व ३० किलो पालाशची मात्रा सूरुवातीच्या काळात दयावी. त्याचबरोबर झिंक सल्फेट २५ किलो प्रती हेक्टर प्रमाणात द्यावे. १३:००:४५ या खताची २ ग्राम प्रती लिटर प्रमाणात द्यावे.  जर पाण्याचा ताण बसला किंवा फुलकाळी लागण्याच्या आधी फवारणी करावी.  शेंगा भरण्यास चांगली मदत होते. अंतर पीक पध्दतीसाठी ५० -६० किलो नत्र व ७०-७५ किलो स्पुरदची मात्र दयावी.

हेही वाचा :माती परीक्षणाच्या किटसाठी मिळणार अनुदान; जाणून घ्या किटचे वैशिष्ट्ये

अंतर पीके- अंतरपीक पद्धतीने लागवड करताना तूर + सोयाबीन (१:३), तूर + मूग (१:३), तूर + बाजरी (१:२), तूर + कापूस (१:६ किंवा १:८), तूर +  सूर्यफूल (१:२), तूर + उडीद (१:२), तूर + भुईमूग (२:३), या पद्धतीने लागवड करावी. 

आंतर मशागत-पिकात १५ ते २० दिवसानंतर कोळपणी करावी. पुढे १०-१५ दिवसांनी खुरपणी किंवा कोळपणी करावी. चांगल्या उत्पन्नासाठी दोन खुरपण्या महत्वाच्या आहेत.

पाणी व्यवस्थापन- हे पीक पाऊसाच्या पाण्यावरती वाढते, त्यामुळे शक्यतो पाणी द्यायची गरज नाही पडत. गरज भासल्यास आणि सिंचनाची व्यवस्था असेल तर फुलोऱ्याच्या आणि शेंगा भरणीच्या काळात पाणी देणे जरुरी आसते.

काढणी व उत्पन्न- तूरीच्या शेंगा वाळल्यावर पीक कापून घ्यावे व काठीच्या सहाय्याने किंवा पेढ्या झोडपून शेंगा आणि दाणे वेगळे करावे. आजकाल तूर पिकाची काढणी गव्हाच्या हार्वेस्टरने सुद्धा केली जाते. सरासरी १४-१७ क्विंटल तूर प्रती हेक्टर मधून काढली जाते.

English Summary: Produce pigeon pea on in this kharif season; know details of cultivation
Published on: 18 May 2020, 07:14 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)