Agripedia

नव्या क्षितिजाची वादळवाट शोधत

Updated on 27 July, 2022 1:24 PM IST

नव्या क्षितिजाची वादळवाट शोधत आणि अवघ्या पृथ्वीचा परीघ मोजू पाहणार वादळ वाऱ्याचे विरुद्ध उभे राहून अज्ञात वाटेवर जहाजंची कापडं फडफडवणारा अवलिया म्हणजेच कोलबस . पूर्ण तूर्तास अवघ जग ग्लोबलायजेशनमुळे इतक जवळ आलंय की आपले जहाजी आरमार शेतकऱ्यानां कोणत्या सागरात लोटावे हाच प्रश्न निर्माण झाला आहे .वातावरणाची गणिते बदलली तसे खर्चाची ही बदलली. मातीचा कणा केव्हाच मोडून निघाला आहे आणि आम्ही शेतकरी मस्तवाल फवारण्याच्या मुजोरा वरती शौकी मिरवण्यात धन्यता मानत आहोत. गेल्या काही दिवसात मला टीव्ही असेल किंवा सोशीयल मिडिया असेल. 

दोन बातम्यानी विचारात पाडले. एक म्हणजे प्रवीण तरडेची लंडन वारीत भेटलेल्या भाजी मार्केट बघतानां नाशिक – वाशी मार्केट साजेशी मराठी कर्तबगारी आणि दुसरे म्हणजे मा. गडकरीच्या विदर्भातील एका भाषणात संत्र्याच्या एक्सपोर्ट च्या संदर्भात सह्याद्रीचा उल्लेख..Hon. Gadkari's speech in Vidarbha mentions Sahyadri in connection with export of oranges. ह्या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी आंतरमुख करणाऱ्या अहोच पण अभिमान निर्माण करणाऱ्या ही आहेत.ऊसाच्या सहकरातील आम्हीच निर्माण केलेल्या कारखानदारीतुन निर्माण झालेली ‘संत्रा ब्रॅंड अशी मागील पिढी आणि आता ‘सुला’ वाईना जाऊन किती एंजॉय करतो पेक्षा एन्जॉय घेते. ह्या कडे नाशिकच्या शेती च्या सुभत्ते कडे उघडे डोळे करून बघणे आता येत्या काळात बघणे गरजेचे बनले आहे. 

ह्या कडे नाशिकच्या शेती च्या सुभत्ते कडे उघडे डोळे करून बघणे आता येत्या काळात बघणे गरजेचे बनले आहे.मॉल मध्ये वाईन विकावी का न विकावी हा राजसत्तेचा निर्णय कदाचित आपणस आठवत पण असेल तो योग्य की आयोग्य ह्या भानगडीत मी सध्या जाणार नाही. तोच स्वदेशी नागरिक विदेशात फिरताना सहज दुकानात मिळणारी बियर किती सहजतेने एन्जॉय करतो. आपण आता आपल्याच मातीच्या बंधिलकितुन आता बघणे गरजेचे वाटते आहे. नाही तर लवकरच आपण गेल्या पिढीत आजची पिढी एक भाग म्हणून नव्याने सडताना आढळून येईल 

व्यवस्था ही कायम राजसत्ता चालवते. पण पीकमातीला शेतकरी चालवतो. पण देशाच्या राहट गाड्यात शेतीला महत्व आहे. पण खोलात गेल्या शिवाय समजून घेता येणार नाही कारण माहितीच पीक ही खोलात गेल्या शिवाय पिकत नाही. हे ही शेतकरीनी समजून घेणे गरजेचे आहे. आज चा शेतकरी शिक्षित आहे. शेतीतल्या बद्दला मध्ये ही प्रत्यक्ष जीवनात बद्दल होऊ पहाणाऱ्य गोष्टी कडे आपण ज्या सहजतेने बघतो. पण त्या गोष्टीचा भाग होणे आपण काही वेळेस दुर्देवाने टाळतो.पण नाशिकचा शेतकरी म्हणून नव्या बदलाचा मान वाटतो. ह्या मातीतिल नव्या शेतकऱ्याची आर्थिक साक्षरतेच्या धड्याच्या जहाजाना नवे कोलबंस येतच राहतील तसे ह्या मातीत कोलबंस निर्माण होत राहतील हाच आत्मविश्वास.

 

shrihari ghumare

शेतकरी माझा एग्रोटेक्नॉलॉजी

(नाशिक)

English Summary: Nashik's agriculture crisis now needs to find a new Columbasa
Published on: 27 July 2022, 01:24 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)