Agripedia

जगातील कोणतेही जमीन असो, कोणतेही हवामान असो,

Updated on 15 July, 2022 12:45 PM IST

जगातील कोणतेही जमीन असो, कोणतेही हवामान असो, कोणत्याही प्रकारचे पाणी असो आणि कोणतेही पीक असो त्यावर मल्टिप्लायर तंत्रज्ञान शेवटचा आणि कायमस्वरूपी उपाय आहे. तिथे मल्टिप्लायर तंत्रज्ञान 100%काम करते.कसे ते पहा! मल्टिप्लायर एक फायदे अनेक..१) जमिनीतील विषाणू मारणे:रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे जमीन कडक किंवा टणक झाली आहे.त्यामुळे सुर्यप्रकाश आणि हवा जमीनीच्या आत पर्यंत प्रवेश करीत नाही. परिणाम जमिनीमध्ये विषाणूंची संख्या वाढली आणि जिवाणूंची संख्या कमी झाली.तज्ज्ञांच्या मते १ ग्राम माती मध्ये १० करोड जीवाणू असले पाहिजे परंतु आत्ता १ करोड पेक्षा कमी आहेत. त्यामुळे पिकांसाठी जमीनीमधून पोषण तत्वे मिळणं बंद झाले आहे.म्हणून आपल्याला बाहेरून खते द्यावी लागतात.परंतु त्यमध्ये सुध्दा १००% पोषण तत्वे मिळत नाहीत.उदा.युरिया 46% नत्र आणि 54% काय आहे याचा उल्लेख सुध्दा नाही. याउलट 

मल्टिप्लायर आधुनिक तंत्रज्ञानामधून वरील कमी भरून काढली आहे. यामध्ये सर्व प्रकारचे पोषण तत्वे मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे जमीनीतील जिवाणूंची संख्या वाढून विषाणूंची कमी होत जाते परिणामी जमीन भुसभुशीत होऊन कसदार बनते म्हणून सुर्यप्रकाश आणि हवा (ऑक्सिजन) जमीनला मोठ्या प्रमाणावर मिळते.शेतीतील मल्टिप्लायरचा वापर वाढल्यामुळे रासायनिक खतांचा खर्च वर्षानुवर्षे कमी कमी होत जातो नंतर शून्यावर येतो आणि उत्पादन क्षमता वाढतं जाते.२) गांडूळ खतांची निर्मिती:मल्टिप्लायरमध्ये मोठ्या प्रमाणात देशी गाईचे कंपोस्ट केलेलं शेण खत, देशी गाईचे गोमूत्र, अनेक प्रकारच्या वनस्पतींचे अर्क, स्वतः बनविलेले ह्मूमिक अँसिड आणि सर्व प्रकारचे न्युट्ररियन्समुळे जीवाणूंची संख्या वाढते बाहेरून द्याव्या लागणाऱ्या रासायनिक खतांचा वापर कमी झाल्यामुळे जमीनीतील उष्णता कमी कमी होत जाते. परिणामी गांडुळं शेतात यायला सुरुवात होऊ लागते. कारण कृषीतज्ज्ञां मते ३५ डिग्री सेल्सिअस पेक्षा अति उष्णता असेल तर गांडूळ शेतातून खोलवर जमीनीत निघून जातात.

गांडूळांची शेतीतील प्रमाण वाढल्यामुळे वर्षाला लाखो रुपयांचे गांडुळ खत मोफत मिळू लागतं. अस वाटत कि, गांडुळ खातांची जणू काही फॅक्टरी तयार झाली आहे. तज्ज्ञांमते गांडूळ खत हे जगातील अप्रतिम दर्जाचे खत मानलं जातं.म्हणून तुम्हाला बाहेरून गांडुळ खत टाकायची गरज नाही.३) किडनाशके, किटकनाशके, तणनाशके आणि विषारी औषधे कायमस्वरूपी बंद:वरील माहिती प्रमाणे आपल्या शेतात रासायनिक खतांचा वापर कमी कमी होत चाललायं, गांडुळ खाताची मोठ्या प्रमाणावर निर्मिती झाली आहे.परिणामी जमीनीत मोठ्या प्रमाणावर सूर्यप्रकाश, हवा खोलवर जात आहे.कृषी तज्ज्ञांच्यामते, आपल्या जमिनीला ९६.८ % पोषण तत्वे सूर्यप्रकाश, हवा आणि पाण्यातून मोफत मिळतात जमिनीतून फक्त 3.2%पोषण तत्वे मिळतात. याचाच अर्थ आपली जमीन 100% सुपीक झालीअसा होतो. सुपीक आणि व्हायरसमुक्त जमीनीमध्ये पीकांवर शक्यतो कोणत्याच प्रकारचे रोग येत नाही आणि आल्यास नुकसान होतं नाही. कारण मल्टिप्लायर तंत्रज्ञानाने तुमच्या पीकांचे मुळं (व्हाईट रूट्स अतिशय निरोगी बनविले आहेत) कारण आमचे लक्ष्य एकच आहे

कृषी क्षेत्रात नवीन युगाचा आरंभ: (नैसर्गिक शेतीतील पुढचे पाऊल) रासायनिक खते व विषारी किटक नाशकांच्या घातक परिणामांमुळे *नैसर्गिक शेती* हि काळाची गरज बनली आहे.१३ वर्षांच्या अथक संशोधनानंतर निर्माण झालेल्या *मल्टिप्लायरने* नैसर्गिक शेतीतील पुढील टप्पा गाठलेला आहे. कदाचित हे कृषी क्षेत्रातील गेल्या 50 वर्षातील सर्वात मोठे संशोधन असेल. याचा सर्वात महत्त्वपूर्ण फायदा म्हणजे जमिनीमध्ये 'नॅचरल इको सिस्टीम' ची पुनर्स्थापना जंगलात कोणी खते टाकायला जाते का? कोणी किटकनाशके फवारायला जाते का? तरीपण दरवर्षी असंख्य बिया खाली पडत राहतात व छोट्या वनस्पती, वेली व महाकाय वृक्ष सतत निर्माण होत राहतात. हे चक्र लाखो वर्षे चालू असून पुढील लाखो वर्षे असेच अव्याहत चालू राहणार आहे. कोणतीही खते/किटकनाशके न वापरता हे चक्र निरंतर चालू राहण्यामागचे कारण आहे त्या जमिनीत नैसर्गिक पणे कार्यरत असलेली *इकोसिस्टम - जैविक प्रणाली.

हे मल्टिप्लायर आपल्या जमिनीत त्या जैविक प्रणालीची पुनर्स्थापना करते.याचे दिसणारे परिणाम: 1) बाहेरून गांडुळे आणून न टाकता देखील काही वर्षांतच आपले शेत हजारों गांडुळांनी भरुन जाते व त्यानंतर दरवर्षी नैसर्गिक पध्दतीने एकरी 2 ते 6 लाख रुपयांचे गांडूळखत मोफत उपलब्ध होते.2) उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते (10 कोटी पेक्षा जास्ती प्रति 1 ग्रॅम माती).3) हानिकारक विषाणू पूर्णपणे कमी होतात.4) भरपूर अन्न उपलब्धतेमुळे पीक एवढे सुदृढ व ताकतवर होते की ते जंगलातील झाडाप्रमाणे कोणत्याही रोगाचा प्रतिकार करु शकते.इतर फायदे: 1) पहिल्या वर्षी उत्पादनात ५०℅ वाढ. (म्हणजे 50 टनाचे 75 टन किंवा 200 क्विंटल चे 300 क्विंटल)2) 5 ते 7 वर्षात उत्पादनात तीन पट वाढ. (म्हणजे 50 टनाचे 150 टन किंवा 200 क्विंटल चे 600 क्विंटल)3) रासायनिक खते व किटकनाशकांची गरज न उरल्याने उत्पादन खर्चात 80% बचत.

हि इकोसिस्टीम - जैविक प्रणाली आपल्या जमिनीत 5 ते 7 वर्षांत स्थिर झाल्यानंतर आपणांस ह्या विशेष उत्पादनाची देखील आवश्यकता राहत नाही. नंतर केवळ देशी गायींचे शेण हे तिप्पट उत्पादन कायम ठेवण्यास पुरेसे आहे.अल्पावधीतच 21 राज्यांमध्ये पोहचून हे विशेष उत्पादन वेगाने लोकप्रिय होत आहे. हे *मल्टिप्लायर* आपल्या भागात पोहचविणे गरजेचे आहे. याचा प्रचार करुन आपण शेतकऱ्यांना खूप चांगल्या प्रकारे मदत करु शकता आणि स्वतः देखील चांगले उत्पन्न कमवू शकता.चला तर मित्रांनो,शेतकरी बांधवांना शेतीचे चांगले प्राॅडक्ट देऊन संपन्न बनवूया.आपल्या शेतातील भरघोस पिक उत्पन्नासाठी आम्ही पाठवलेली 13 वर्ष शेतकऱ्यांच्या परिश्रमातून संशोधन केलेल्या "मल्टिप्लायर" तंत्रज्ञानाची संपूर्ण माहिती आत्मसात करा.

                                                                अधिक माहिती साठी संपर्क साधा.

संदिप घाडगे मल्टिप्लायर प्रतिनीधी 

ता. पाटण जि. सातारा 9604108633

English Summary: Modern technology to permanently revitalize the soil .. "Soil Multiplier"
Published on: 15 July 2022, 12:45 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)