Agripedia

पाण्याचा पिकांच्या संतुलित वाढीवर किती परिणाम होतो. माती ( जमिन ) , पाणी , हवा ( वायू ) , आकाश रिकामी जागा व अग्नी ( सुर्य ) ह्या पंचमहाभुतांपासून सर्व जीव बनलेले आहेत.

Updated on 28 November, 2021 8:46 PM IST

ह्यां पंचमहाभुतांचे प्रमाण सर्व सजिवांमध्ये व त्यांचे अवशेषामध्ये कमी अधीक असते वनस्पती , प्राणी , पक्षी व सर्व सुक्ष्मजीव या सर्वांची निर्मिती अशाच प्रकारे झाली आहे  

    जर यांचे संतुलन बिघडले तर त्या सजिवाचे ( प्रकृती ) आरोग्य बिघडते 

आज सर्व सजीवांची प्रकृती यामुळेच बिघडली आहे  

निसर्गाच्या नियमनामध्ये मानवी हस्तक्षेप प्रचंड वाढला व त्याचे दुष्परिणीम प्रत्यक्ष शेतकरी व अप्रत्यक्ष सर्व मानवजात व सजीवांवर होत आहेत 

 आज वनस्पतींचे व पर्यायाने सर्व सजिवांचे जिवन प्रचंड धोकादायक परिस्थितीत आहे  

 पिकांवरील रोगराई व माणसांना होत असलेला आजार हे या पंचमाहभूतांच्या अशुद्धी व असंतुलनामुळे होनार्या दुष्परिणामाचे केवळ एक उदाहरण आहे .

 प्रथम उथळ व वरवर विचार करायची सवय सोडा , चिंतन करायला शिका  

 पाणी हे एक पंचमहाभूत आहे 

पाचही पंचमहाभूते एकमेकांच्या सहकार्यांने समन्वयाने काम करतात 

ते एकमेकांना पुरक किंवा संतुलन बिघडल्यास बाधक ही ठरू शकतात

 

 पिकाच्या निकोप वाढीसाठी पाणी काय कार्य करते ?

 

 मुलद्रव्यांचे जमिनीतून पिकात व पिकाच्या अंतर्गत भागात वहनाचे माध्यम म्हनून काम करते  

 बाष्पिभवनाच्या माध्यमातून तापमानाचे नियमन करते  

 पेशींमधील पिएच व प्रवाहीता संतुलित करते  

 विविध चयापचय क्रियेत मिडीया म्हनून काम करते 

 पिकातील ताजेपणा टिकवून ठेवतो.

 पाणी घातक का ठरते?

 

 क्षारांचे प्रमाण वाढल्याने टीडीएस , पिएच व एसी वाढतो व जिवन असलेले पाणी विष बनून जाते 

  असे पाणी जर पिकाने उचलले तर मुळांना , झायलेम टिशूंना व स्टोमॅटाला देखील नुकसान करते व पाने पिवळी पडून गळू लागतात

जमिनित ओरगॅनिक मॅटर व कार्बन कमी झाला की जमिनीची सच्छिद्रता कमी होते व पाणी मुळाभोवती साचून मुळांना पर्यायाने पिकाला व मुळांभोवती असलेल्या सुक्ष्म मित्र जिवांना गुदमरवते   

 अपटेक थांबते पिक कमजोर होते. रोगजंतू व नेमेटोड वाढून ते रोगांना आमंत्रण देतात

 पाण्यात विरघळलेली विषारी रसायने पिकांच्या चयापचय क्रियेत अडथळा करतात 

अनावश्यक किंवा अतिरेकी फवारण्या आणि जमिनीतून पाण्याचा वापर हवेतील ह्युमिडीटी ( आर्द्रता ) वाढवन्यास कारणीभूत ठरते परिणामी रोगाला व किडींना अनुकूल वातावरण तयार होते

  पाण्याचे संतुलन कसे असावे

 मुळीचे क्षेत्र पुर्ण भिजेल एवढे पाणी द्यावे जमिनीच्या प्रकारानुसार हलक्या जमिनीत एक - दोन दिवसांनी व भारी जमिनीत तिन - चार दिवसांनी ड्रीपखालील किंवा पाटपाण्यातील जमिनीत कुठेही माती उकरा दोन तीन इंच खोलीतील माती हातात घेऊन दाब देऊन लाडू बनवा

जर लाडू बनत नसेल तर पाणी कमी पडते आहे .

   जर लाडू बनवून कमरेच्या उंचीवरून जमिनिवर टाकून भुगा होत असेल तर पाणी योग्य आहे 

  जर लाडूचा भुगा होत नसेल तर जास्त आहे 

    वरीलप्रमाणे तपासनी करून पाण्याचे नियोजन करावे  

 

 डाळींबाला उथळ पाणी देऊ नये , त्याला खोलवर ओलावा गरजेचा असतो परंतू ९५% वाफसा व ५% वेळ ओलावा असावा म्हनजेच कमीत कमी वेळेत जास्त पर्क्युलेशन करन्याची व्यवस्था असावी डाळींब पिकात ६ किंवा ८ लिटर / ताशी चे ड्रीपर वापरावे 

    इनलाईन ड्रीपर ऐवजी ओनलाईन ड्रीपर जास्त उपयुक्त ठरतात  

   डाळींब पिकाला हलक्या जमिनित २.५ तास आठवड्यातून दोन किंवा तिन वेळेस व भारी जमिनित २ तास आठवड्यातून.जास्तित जास्त दोन वेळेस पाणी द्यावे 

 

 ज्यावेळी आम्ही पाणी कमी करा असे सुचवतो तेव्हा पाण्याचे तास कमी न करता दोन पाळ्यांमधील दिवस वाढवणे अपेक्षीत असते 

   पाण्याचे लिटर कमी केल्यास पिकावर ताण निर्माण होऊ शकतो  

    दिवसांचा अंतराल ( गॅप ) वाढविल्याने झाड संतुलन करन्यास प्रवृत्त होते व अधीक कणखर बनते  

 

डाळींब हे दुष्काळी व कोरड्या हवामानातील पिक असल्याने त्याच्यात पाणी धरूण ठेवन्याची क्षमता असते फक्त त्यासाठी जमिनित ह्युमस चे प्रमाण टिकवून ठेवने अत्यंत महत्त्वाचे ठरते ,  

   सोबत विविध कडब्यांची ( बाजरी, मका , ज्वारी ) कुट्टी ड्रीपरवर मल्चिंग करून टाकने अत्यंत फायदेशीर ठरत आहे

या वर्षी च्या सर्व कही वापरूनही रोग वाढल्याचे २-३ % बागांमध्ये लक्षात आल्यानंतर तिन प्रमुख कारणे समोर आले .

१. रासायनिक फवारण्यांचा अतिरीक्त व अनावश्यक वापर 

२. बेसल डोस पिकाच्या आवश्यकतेपेक्षा कमी भरने 

३ . पाण्याचा अति वापर किंवा अती ताण 

   

  पाण्याचा अती वापराने म्हनजे रोज किंवा दिवसाआड पाणी देणे , ३-४ तास पाणी देणे , फ्लोचे पाणी सोडने होय

 मुळीचे क्षेत्र सतत ओले ठेवने म्हनजे मर , नेमॅटोड , तेल्या , डाग यांना आमंत्रणच होय  

     पाण्याचे नियोजन करताना आपन पाण्याचा पिएच , टीडीएस व ईसी तपासला तर असे लक्षात येईल की ते पाणी पिकाला जास्त देणे म्हनजे विष दिल्यासारखे.

 पाण्याचा पिएच हा साडेसहा ते साडेसात , टीडीएस ३००-४०० असायला हवा परंतू तो यापेक्षा जास्त आढळून आल्याने पिकावर पाण्यातील जास्तीच्या पीएच व टीडीएस चे विषाक्त परिणाम होतात

 “ चला , पाणीच तर आहे , कितीही दिले तर त्याला काय होतेय “ असे म्हनून चालनार नाही.

आपन क्षापरट पाणी पिकांना देत आहोत , आजकाल आपन घरात आरओ चे मशीन मधून फिल्टर करून पाणी घेतोय कारण ते थेट पिण्यायोग्य राहीलेले नाहीये मग ते पिकांना तसेच सुरक्षीत कसे असू शकते 

   ४/५ वर्षांपुर्वी मातीत ओरगॅनिक कार्बन होता जो पाणी फिल्टर करून पिकाला उपलब्ध करून देत होता , आज कार्बन नसल्यात जमा आहे त्यामुळे ते क्षारयुक्त जसेच्या तसे पिकात उचलले जाते व पिकावर दुष्परिणाम करतेय  

    आपन जर वाटर सोल्यूबल खते सोडत असाल तर आपल्या ड्रीपरजवळ पांढरे थर तयार होतात ज्यामुळे ड्रीपर चा डिस्चार्ज कमी होतो किंवा ते बंदही पडतात

पाणी जे पिकाचे जिवन आहे ते दुषीत असल्यामुळे पिकासाठी घातक बनले आहे  

   ३०-४० वर्षांपुर्वी पावसाच्या पाण्यामुळे पिके ताजीतवानी व्हायची परंतू आज त्यातील दुषीत रासायनिक रेसीड्यूंमुळे पिकाचे आरोग्य धोक्यात आले आहे 

 

शरद केशवराव बोंडे.

English Summary: Learn how water management should be.
Published on: 28 November 2021, 08:46 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)