Agripedia

आपण शेतकरी वर्षानु वर्ष शेती करीत आहोत, पारंपरिक शेती करत असताना अनेक समस्यांचा सामना करतो.

Updated on 25 March, 2022 12:35 PM IST

आपण शेतकरी वर्षानु वर्ष शेती करीत आहोत, पारंपरिक शेती करत असताना अनेक समस्यांचा सामना करतो. शेतीतून आपल्याला उत्पन्न मिळते ते आपल्या शेतीत असलेल्या जिवाणूंमुळे ,जितकी जिवाणूंची संख्या जास्त तितके उत्पन्न जास्त,जिवाणू जास्त असले तर त्यांना लागणारे खाद्य सेंद्रिय कर्ब हि जमिनीत जास्त असले पाहिजे, कारण सेंद्रिय कर्ब हेच या जिवाणूंचे खाद्य असते, म्हणून आपण जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवला तर जिवाणूंची संख्याही वाढेल, पण आपण सेंद्रिय खता ऐवजी रासायनिक खतांचा जास्त वापर करतो.

भारतात हरित क्रांतीला (1967) सुरुवात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर वाढला, 

उत्पनातही 25/30 % वाढ मिळाली पण सातत्याने रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे ज्या जिवाणूंमुळे आपल्याला उत्पन्न मिळते त्या जिवाणूंची संख्या आपण 5/10% वर आणून ठेवली ,आणि म्हणूनच गेल्या 8/10 वर्ष पासून आपल्या उत्पनात सातत्याने घाट होत आहे.

      आपल्या शेतीची उत्पादकता वाढवायची असेल तर सेंद्रिय पदार्थांचा वापर केल्याशिवाय वाढणार नाही,सेंद्रिय पदार्थ मोठ्या प्रमाणात वापरलेही व आपल्या जमिनीत जिवाणू नसतील तर उत्पन्न कसे येईल? रासायनिक खतांमुळे आपण जी जिवाणूंची संख्या नगण्य करून टाकली आहे, ती वाढवण्यासाठी जमिनीत जिवाणू सोडावे लागतील, तरच आपले शेतीउत्पन्न वाढेल .

जिवाणूंची शेतजमिनीतील संख्या वाढवण्यासाठी ऍझो, रायझो , पीएसबी, वेस्ट कंपोझर, ईम , जीवामृत, जीवामृत स्लरी , घण जीवामृत , यांचा वापर करावा लागेल.  

मित्रानो जिवाणू वाढ करण्यासाठी खूपच कमी खर्चिक असा उपाय (एकरी 40/50रुपये) म्हणजे वेस्ट डीकंपोझरची ड्रेंचिंग करणे,दुसरे ईम सोल्युशन एकरी खर्च 60/70 रुपये .या दोन्ही प्रकारच्या जिवाणूंची आपल्या पिकांना ड्रेंचिंग करा आणि हमखास 25/30% उत्पनात वाढ मिळवा.

शेतीतून आपल्याला उत्पन्न मिळते ते आपल्या शेतीत असलेल्या जिवाणूंमुळे ,जितकी जिवाणूंची संख्या जास्त तितके उत्पन्न जास्त,

जिवाणू जास्त असले तर त्यांना लागणारे खाद्य सेंद्रिय कर्ब हि जमिनीत जास्त असले पाहिजे, कारण सेंद्रिय कर्ब हेच या जिवाणूंचे खाद्य असते, म्हणून आपण जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवला तर जिवाणूंची संख्याही वाढेल, पण आपण सेंद्रिय खता ऐवजी रासायनिक खतांचा जास्त वापर करतो.

भारतात हरित क्रांतीला (1967) सुरुवात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर वाढला, उत्पनातही 25/30 % वाढ मिळाली पण सातत्याने रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे ज्या जिवाणूंमुळे आपल्याला उत्पन्न मिळते त्या जिवाणूंची संख्या आपण 5/10% वर आणून ठेवली.

माहिती साठी मला वैयक्तिक फोन करा, किंवा ज्याचे कडे ह्या जीवांचे विरजण उपलब्ध आहे त्यांच्याशी संपर्क करा.

          

अधिक माहितीसाठी संपर्क

 श्री शिंदे सर ,भागवती सीड्स चोपडा,

भ्रमणध्वनी - 9822308252

English Summary: Know about relationship about organic fertilizer and microbes
Published on: 25 March 2022, 12:32 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)