Agripedia

ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या 60% ठिबक सिंचन हे एकट्या महाराष्ट्रात केले जाते व यातून पिकांना खते पुरविल्यास फर्टिगेशन हे शेतीसाठी वरदान मानले जाते . ही पद्धत सर्वप्रथम 1960 मध्ये इस्राएल मध्ये सुरू झाली

Updated on 05 December, 2020 12:07 PM IST

ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या 60% ठिबक सिंचन हे एकट्या महाराष्ट्रात केले जाते व यातून पिकांना खते पुरविल्यास फर्टिगेशन हे शेतीसाठी वरदान मानले जाते . ही पद्धत सर्वप्रथम 1960 मध्ये इस्राएल मध्ये सुरू झाली व त्यांनतर 1970 मध्ये अरस्कॉट यांनी पहिला अहवाल सादर केला, ज्यामध्ये हातानी टाकण्याच्या खत पद्धतीपेक्षा सिंचनातून टाकलेल्या युरिया ची पध्दत ही अधिक लाभदायक व कार्यक्षम आढळून आली होती." आधुनिक शेती पध्दती मध्ये पाण्याची व खताची बचत करून थेंबा  थेंबाने अथवा सुक्ष्म धारेने द्रवरूप/घनरूप खतामधील पोषक अन्नद्रव्ये पिकाला पुरवली जातात. विशेषतः फुलोऱ्यात, मोहोर येण्याच्या वेळी, फळ धारणाच्या वेळी, त्यानंतर  फळांची वाढ होण्यासाठी अन्नद्रव्यांची अधिक मात्रा हवी असते अश्यावेळी फर्टिगेशन द्वारे दिलेली खते  उपयोगी पडतात.

             या समस्येवर उपाय म्हणून पिकाला योग्य त्या वेळी संतुलित प्रमाणात पाण्याद्वारे विद्राव्य खते देने आवश्यक असते. ज्यामुळे  अन्नद्रव्यांची पूर्तता करता येते ,पाण्याची व खताची बचत होते , पिकाला गरजे नुसार खत पाणी मिळाल्या मुळे पिकाची उगवण शक्ती पाठोपाठ पिकाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढते हे साध्य करण्यासाठी  फर्टिगेशन प्रक्रिया लाभदायक  ठरते.                                                    

फर्टिगेशन म्हणजे काय ?

पिकाच्या मूळशी गरजेनुसार ठिबक सिंचनातून योग्य अन्नद्रव्ये, खते पाणी एकत्रितपणे देण्याच्या पद्धतीला  फर्टिगेशन असे म्हणतात

 

इरिगेशन द्वारे खते देण्याची पद्धत :- सामान्यता  ठिबक सिंचन व तुषार सिंचन पद्धतीचा उपयोग करून खते वापरली जातात .यात प्रामुख्याने खताची टाकी , व्हेंच्युरी,  पंप ईत्यादींचा उपयोग होतो.

 

खताची टाकी :- या टाकीमध्ये खतांचे मिश्रण असून ते मूख्य पाईपलाईन ला जोडलेली असतात . इररिगेशन चे पाणी टाकीमधील खताला पूर्णपणे विरघळून टाकतात व त्यांनतर ते मिश्रण ठिबकच्या नळी  द्वारे पिकाला पुरवली जातात.

 

व्हेंच्युरी :- व्हेंच्युरी हे उपकरण  पाईप मध्ये दबाव निर्माण करून त्या ठिकाणी खताच्या  मिश्रनाला व इरिगेशन च्या पाण्याला ओढून ते तीव्र गतीने पाईप कडे  सोडण्यात येते. हे उपकरण कमी खर्चाचे असून कमी जागेसाठी सोईस्कर आहे.

पंप :- पम्पाद्वारे  खताचा व पाण्याचा प्रवाह हा संतुलित करता येतो .

 

इरिगेशन  फिल्टर :-  मुख्य पाइपलाइन ला फिल्टर लावल्यास अशुद्ध पाणी शुद्ध होते . व त्यामुळे नळ्यामध्ये घाण साचत नाही व पाण्याचा प्रवाह थांबत नाही .

फर्टिगेशन चे फायदे:-                          

  1. द्रवरूप खते सिंचनातून दिली असता तीव्र द्रावण सौम्य होते. त्यामुळे पिकांच्या मुळावर अनिष्ट परिणाम होत नाही.
  2. द्रवरूप खतांच्या रूपाने मूख्य पोषणद्रव्याचा व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समतोल पुरवठा केला जातो.
  3. पिकांच्या वाढीची अवस्था व त्यांच्या गरजेनुसार द्रवरूप खतांचा वापर केला असता उत्पादनात वाढ होते.
  4. सिंचनाद्वारे खते दिल्यास पिकांना पाणी पोषणद्रव्यांचा साठा मुळांजवळ होतो व पीक वाढीस वेग येतो.
  5. खते अनियमित आणि कमी प्रमाणात वापरल्यास जमिनीत अन्नद्रव्यांचा साठा कमी असतो आणि नियमित असतो. त्यामुळे अति पावसाचे निचऱ्याद्वारे किंवा जमिनीवरून जास्तीत जास्त पाणी न जाता खताची एकूण२५-३०%बचत होते.
  6. कीटकनाशके व तणनाशके द्रवरूप खतात मिसळून दिल्याने मजूर ,यंत्रसामग्री व पर्यायाने आर्थिक बचत होते.
  7. हलक्या वालुकामय किंवा मुरमाड जमीनित पिकाचे उत्पादन येण्यासाठी खास व्यवस्थापणेची गरज असते. कारण जमिनीत पाणी व खत या दोन घटकांचा सहभाग महत्त्वाचा असतो द्रवरूप खतामुळे या समस्येचे निराकरण करता येते.
  8. फर्टिगेशन मुळे खतवापर कार्यक्षमता, पाणी वापर कार्यक्षमता व जमिनीचा सुपीकता वाढते व रोगांना बळी पडण्याचे प्रमाण थांबते. 

फर्टिगेशन करतांना घ्यावयाची दक्षता :-

  1. ठिबक तोट्या / ड्रीपर्स मूख्य पाइपलाइन ला योग्य रीतीने  जोडावेत.
  2. ठिबक तोट्या/ ड्रीपर्स यामध्ये माती किंवा पालापाचोळा जाणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पिकाला नळ्यांचा त्रास होणार नाही एवढे अंतर ठेवावे.
  3. ठिबक /सूक्ष्म सिंचन संचामध्ये खत शेवाळे, गंधक,लोह,किंवा इतर क्षार साचू देऊ नये,त्यामुळे उत्सर्जक/ठिबक तोट्या बंद पडतात, शेवाळ  असल्यास क्लोरीन प्रक्रिया व रासायनिक अशुद्धता असल्यास आमल प्रक्रिया करावी.

      

    लेखक:

          कु. आचल देवेंद्र इंगळे

          विद्यार्थी (बी.एससी.कृषी-अंतिम वर्ष)                                                                                                                      

          स्व.आर.जी.देशमुख कृषी महाविद्यालय, तिवसा. जि. अमरावती

English Summary: importance of fertigation system
Published on: 05 December 2020, 12:07 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)