Agripedia

आपला शेती व्यवसाय निसर्गावर अवलंबून आहे. तेव्हा या निसर्गाचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला हा व्यवसाय योग्य करता येणार नाही.

Updated on 30 January, 2022 9:17 PM IST

आपला शेती व्यवसाय निसर्गावर अवलंबून आहे. तेव्हा या निसर्गाचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला हा व्यवसाय योग्य करता येणार नाही. फक्त अंग मेहनत केल्याने शेती पिकत नसते राव. इंग्लिश भाषेत मेहनत ला हार्ड वर्क असे म्हणतो. पण केवळ हार्ड वर्क उपयोगी पडत नाही. त्यामधे हार्ट वर्क म्हणजे हृदयापासून काम केले पाहिजे हेही तेवढंच महत्वाचं त्या मधे डोक्याने काम केले पाहिजे. कोणत्याही व्यवसायात काम करताना त्या क्षेत्राच्या कामाचे शास्त्र जाणले नाही तर फळ मिळत नाही. शेतीत तसा निसर्गाचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे डोक्याने शेती करावी लागते. निसर्गाचा व्यवहार चक्राच्या नियमाने होत असतो. पावसाचे पाणी पडते. त्याच पाण्याची बाष्प होऊन तिचे ढग बनतात. त्या ढगातून पुन्हा पाऊस पडतो. तेच पावसाचे पाणी वाफ होऊन ढगात रूपांतरित होत असते. असे हे पाण्यापासून पाण्यापर्यंतचे चक्र असते.

तीच अवस्था पिकांची असते. शेतीमध्ये आपण एखादे पीक घेतो. ते पीक शेतातल्या मातीचा कस वापरून आपल्याला धान्य देते. ते ज्या मातीतला कस ओढून घेत असते. ते पीक त्या मातीतला त्याने ओढून घेतलेला कस परत करीत असते. 

प्रत्येक पिकाची ही कस परत करण्याची शक्ती कमी जास्त असते. ते मातीला काही ना काही देत असतेच. गव्हाचे पीक जमिनीचा कस ओढून घेते आणि आपल्याला गहू देते पण निघता निघता ते आपले काड या जमिनीला देते. तेच काड पुन्हा खत म्हणून वापरले पाहिजे. हरबरा, तूर, भुईमूग, मूग, उडीद ही पिके तर आपल्या मुळाशी असलेल्या गाठीतून जमिनीला भरपूर नत्र देत असतात. पीक घेणे, त्याने टाकून दिलेेले अवशेष पुन्हा खत म्हणून वापरणे, त्यातून पुन्हा पीक काढणे हे चक्र आहे. सेंद्रीय शेतीत याच चक्राचा वापर केला जात असतो. शेतातली केवळ पिकेच हे चक्र चालवत असतात असे नाही तर कीटक, प्राणी हेही अशाच प्रकारे या चक्रात सहभागी होत असतात. गाय, म्हैस, बैल हे प्राणी शेतात निर्माण झालेला चारा, कडबा किंवा गवत खातात आणि आपले पोट भरतात. हे प्राणी आपले पोट फुकट भरत नाहीत. ते तो चारा पुन्हा उगवावा यासाठी आवश्यक असलेले शेण आणि मूत्र पुन्हा शेतात टाकतात.

गाय चारा खाते, शेण देते, शेणातून पुन्हा चारा तयार होतो. हे निसर्गाचे चक्र आहे. पक्षीही असाच व्यवहार करीत असतात. आपण कधी शेतात नांगरणी करतो तेव्हा जमिनीतले खालचे मातीचे थर उलथून वर येतात. त्या थरात काही कीडी असतात काही कृमी असतात. त्यांना वेचून खाण्यासाठी बगळे आणि अन्य पक्षी जमा व्हायला लागतात. त्यांना शेतातून हे खाद्य मिळते. पण ते वेचून खाऊन उडून जाताना ते पक्षी शेतात शिटून जातात. आपली विष्ठा ते जमिनीला देतात. त्यांचेही मलमूत्र शेताला खत म्हणून उपयोगी पडत असते. निसर्गाच्या या चक्राचा अनुभव केवळ शेतातच येत असतो असे नाही. आपण आपल्या गाड्या पळवण्यासाठी जे पेट्रोल वापरत असतो ते पेट्रोल किंवा डिझेल हाही अशा एका मोठ्या चक्राचाच भाग आहेे. पूर्वी सृष्टीचे जे अवशेष पृथ्वीच्या खालच्या थरात दाबले गेले त्यातूनच हे तेल निर्माण झाले आहे. हेही शेतातल्या चक्रासारखेच एक चक्र आहे पण या दोन चक्रातला फरक आहे.

पेट्रोल तयार होणे ही अनेक वर्षांचीच नव्हे तर अनेक शतकांची प्रकिया आहे. शेतातले चक्र मात्र दरसाल फिरत असते. ते चक्र कमी वेळेत फीरून पूर्ण होते. या चक्राचा वापर शेतीत करणे म्हणजे नैसर्गिक किंवा सेंद्रीय शेती होय. शेतात अनेक गोष्टी वाया जात असतात.

त्यांचे मोल जाणणे सेंद्रीय शेतीत आवश्यक असते. या वाया जाणार्‍या म्हणजे निसर्गाने फुकट दिलेल्या घटकांचा आपण जास्तीत जास्त वापर करायला लागलो की आपल्याला बाजारातून फार काही विकत आणावे लागत नाही. तसे झाले की आपल्या पिकांसाठी होणारा उत्पादन खर्च आपोआप कमी व्हायला लागतो. येथेच शेतीचे अर्थशास्त्र सुधारायला सुरूवात होईल. आपली एका मोठ्या समस्येतून सुटका होण्याची प्रक्रिया सुरू होईल. आपण निसर्गाने जे फुकट दिले आहे त्याकडे दुर्लक्ष करीत आहोत आणि चढ्या भावाने बाजारातून रासायनिक खते आणून ‘प्रगतिशील’ शेतकरी व्हायला लागलो आहोत. ही चूक आपल्याला जितक्या लवकर लक्षात येईल तितके चांगले.

 

विचार बदला जिवन बदलेल

मिलिंद जि गोदे

Mission agriculture soil information

English Summary: Farming is not dengi dene
Published on: 30 January 2022, 09:17 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)