Agripedia

केळी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवली तर ती चटकन काली पडतात. लिबलिबित होतात. ती बघवतही नाहीत आणि खाववतही नाहीत. सफरचंद वगैरे फळं मुळातच थंड हवामानात उगवणारी आहेत, त्यामुळे ती उष्ण हवामानात भराभर पिकून लवकर खराब होऊ लागतात.

Updated on 01 March, 2023 10:25 AM IST

केळी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवली तर ती चटकन काली पडतात. लिबलिबित होतात. ती बघवतही नाहीत आणि खाववतही नाहीत. सफरचंद वगैरे फळं मुळातच थंड हवामानात उगवणारी आहेत, त्यामुळे ती उष्ण हवामानात भराभर पिकून लवकर खराब होऊ लागतात. म्हणून ती टिकवून धरण्यासाठी त्यांना थंड वातावरणात, शीतगृहात ठेवणं गरजेचं होऊन बसतं. 

त्या थंडीचा त्यांच्यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही, कारण त्या घसरलेल्या तापमानाला तोंड देण्याची क्षमता मुळातच त्यांच्यामध्ये असते. त्या फळांचे घटक असलेल्या पेशी त्या थंड हवामानात आपला संसार नीट थाटू शकतात. आपलं स्वरूप टिकवून धरतात. केळीचं तसं नाही.

केळं हे मुळातच उष्ण कटिबंधातलं फळ आहे ते उष्ण हवामानातच वाढतं. रेफ्रिजरेटरच्या थंड वातावरणात ठेवल्यामुळं ते काही भरभर पिकत नाही. उलट कडब्यामध्ये किंवा कापडात गुंडाळून ठेवलं तर ते पिकण्याची प्रक्रिया जरा जोमानं होते. झाडावरून जेव्हा केळ्यांचा घड उतरवला जातो तेव्हा ती केळी हिरवीच असतात. पिकलेली नसतात.

सांगलीतील बाहुबली कांदा ठरतोय चर्चेचा विषय! एकाच कांद्याचे वजन तब्बल पाऊण किलो...

ती जर कापडात गुंडाळून ठेवली तर ती पिकायला लागतात; पण थंड हवामानात ती ठेवली तर त्या थंडीचा त्यांच्यावर अनिष्ट परिणाम होऊ लागतो. कारण त्या तापमानाला तोंड देण्याची क्षमता त्यांच्यात नसते. त्यांना त्यापोटी इजाच होते.

त्यातल्या घटक पेशींच्या अंतरंगातली रचना बदलायला लागते. त्यांचं अखंडत्वच नाहीसं व्हायला लागतं, त्या पेशींमधल्या निरनिराळ्या उपांगांना आपापलं नेमून दिलेलं काम बिनबोभाट पार पाडता यावं म्हणून त्यांच्याभोवती काही कुंपणं घातलेली असतात.

त्यांना मेम्ब्रेन्स असं म्हणतात. हे कुंपणांचे पडदे फाटतात आणि सगळी सरमिसळ होते. साराच सावळा गोंधळ उडतो. थंड हवामानात राहावं लागल्यामुळं त्या केळीच्या पेशींमध्ये असे जिवावर उठणारे परिणाम होतात.

शेतकऱ्यांचे यांत्रिकीकरण आहे गरजेचे

पेशींचं आयुष्य संपायला आलं की त्यांचा नाश करण्यासाठी ज्या प्रक्रिया अंगभूत असतात, त्या आपलं काम करायला पुढे सरसावतात. केळं नासायला लागतं. त्यापोटीच मग त्याच्या सालीवर काळे डाग पडायला सुरुवात होते.

त्यांची व्याप्ती वाढून मग सगळी सालच काळीढुस्स होते. केळ्याला थंडी मुळी सोसतच नाही केळंच कशाला, त्याच्यापासून केलेलं शिकरणही रेफ्रिजरेटरमध्ये जरूरीपेक्षा जास्त वेळ ठेवलं तर काळं पडायला लागतं.

महत्वाच्या बातम्या;
कांद्याच्या दरासाठी आता अजित पवार आक्रमक, सभागृहात केली मोठी मागणी..
फळबाग लागवडीपूर्वी मातीचे परीक्षण गरजेचे, पीक वाढीस ठरेल उपयुक्
प्रोत्साहन अनुदान योजनेसाठी एक हजार कोटी, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

English Summary: Farmers, why do bananas turn black? Read in detail..
Published on: 01 March 2023, 10:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)