Agripedia

जमिनीत सेंद्रिय कर्ब पुन्हा साठवणे हाच आपल्या सर्वांचा उद्देश असला पाहिजे. नवीन मार्गाचा शोध घ्यावा लागेल.

Updated on 05 January, 2022 3:51 PM IST

जमिनीत सेंद्रिय कर्ब पुन्हा साठवणे हाच आपल्या सर्वांचा उद्देश असला पाहिजे. नवीन मार्गाचा शोध घ्यावा लागेल. इंग्रजीमध्ये याला "कार्बन सिक्वेस्ट्रेशन'' असे म्हणतात.

    आपण शेतात चालताना शेतजमीन इतकी भुसभुशीत असली पाहिजे की त्या जमिनीवरून चालताना आपण गादीवरून चालत आहोत असा भास झाला पाहिजे, ती जमीन सुपीक, अशा जमिनीत मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्ब उपलब्ध असतो, अश्या जिवाणूंची संख्या एक ग्राम मातीत 2 कोटी 40 लाख पेक्षा जास्त असते, त्यात 130 प्रकारचे जिवाणू असतात.

              आपल्या जमिनीत मुळ मित्र जिवानु समुह वाढविणे महत्वाचे आहे.रोगरोधक उत्पत्तीसाठी पिकाचे सर्व वान त्याच बरोबर जमिनीच्या इतर घटकांचे प्रमाण,जिवाणू मुळे होणाऱ्या जीवणूंचे प्रकार या सर्व गोष्टी लक्षात घेणे अतिशय महत्वाचे ठरते.ज्या पध्दतीने आपण डोळ्याने दिसू शकणाऱ्या घटकांची काळजी घेतो त्याप्रमाणे आपल्या डोळ्यांने न दिसणार्या मित्रसुक्ष्मजीवांचा अभ्यास करणे नितांत गरजेचे आहे.

आपल्या शेतात कोणकोणते मित्र जिवाणू मुळे मित्रजीवाणूसंग्रहाचे संरक्षण होईल हे बघितले जाणे आपल्या साठी आवश्यक आहे.मित्रजीवाणू जमीनीत सोडतांना त्यांना वाढविण्यासाठी विचार करायला हवा.हि आपली सर्वाची जबाबदारी आहे.

या साठी आपल्याला हे करता येईल

  जमिनीत सर्व पिकांना लागणारा अन्नद्रव्यांचा साठा मुबलक असला तरी तो पिकांना उपलब्ध स्वरूपात असत नाही. जमिनीमध्ये जिवाणू असल्यास ते आपल्या जीवनचक्रातून पिकाला जमिनीतून किंवा वातावरणातून योग्य वेळी उपलब्ध करून देतात. परिणामी पांढया मुळांची संख्या व आकार वाढतो. •जिवामृताच्या वापराने जमिनीतील जिवाणूंची संख्या मोठ्या पटीत वाढवता येते.

 त्यांची संख्या वाढल्यामुळे हवेतील नत्र शोषून घेण्याचे प्रमाण वाढते.

 पिकांना नत्र व इतर पूरक अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे शाकीय वाढ जोमदार होते.

पीक तजेलदार, टवटवीत व निरोगी दिसून येते. 

 सेंद्रीय शेती पद्धतीत सेंद्रीय घटकांचा वापर वाढवल्यावर जिवाणूंना खाद्य उपलब्ध होते. ते कुजण्याची प्रक्रिया वेगाने होते. जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढते. शेतात गांडुळांची संख्या वाढल्याने जलधारणा क्षमता वाढते.सेंद्रीय पदार्थामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो. पावसाच्या खंड काळातही झाडे तग धरू शकतात. 

 जिवामृताचा वापर केलेल्या शेतातील भाजीपाला व फळांची प्रत ही सर्वोत्तम मिळू शकते. त्याशिवाय चवही उत्तम होते. साठवण क्षमता चांगली राहत असल्याचाशेतकयांचा अनुभव आहे. जिवामृताच्या वापरामुळे कमी खर्चात चांगले उत्पादन मिळण्यास मदत होते.

त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात 

जिवाम्रुत तयार करणे

बिजामृत तयार करणे

वेस्टडिकंपोझर तयार करणे

गोक्रुपाअम्रुत तयार करणे

रायझोबियम

पिएसबी

व ईतरही गोष्टी शेतात तयार करुन त्याचा वापर शेतात केल्यास मित्रसुक्ष्मजीव जमीनीत वाढतील व नक्कीच जमीन हि सुपिक व नरम बनेल पर्यायाने जमीनीतील सेंद्रिय कार्ब वाढेल व जमीन जिवंत राहील

 

आपलाच शेतकरी मित्र

विजय भुतेकर सवणा

ता.चिखली,जि.बुलढाणा

मो.न.9689331988

English Summary: Do for soil this procedure
Published on: 05 January 2022, 03:51 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)