Agripedia

महाराष्ट्र सोयाबीन आणि कपाशी लागवडीत अख्ख्या भारतात एक महत्वाचे योगदान देतो पण ह्यावर्षी सोयाबीन आणि कपाशीचे उत्पादन घटण्याचा अंदाज वर्तवला जात आहे याचे कारण असे की महाराष्ट्रातील एकट्या अकोला जिल्यात खुप मोठ्या प्रमाणात किडिंचा हाहाकार माजलाय, अकोला आणि आजूबाजूच्या परिसरात सोयाबीन आणि कपाशी पिकावरील रोगानी पार थैमान घातलाय.

Updated on 09 September, 2021 11:45 PM IST

महाराष्ट्र सोयाबीन आणि कपाशी लागवडीत अख्ख्या भारतात एक महत्वाचे योगदान देतो पण ह्यावर्षी सोयाबीन आणि कपाशीचे उत्पादन घटण्याचा अंदाज वर्तवला जात आहे याचे कारण असे की महाराष्ट्रातील एकट्या अकोला जिल्यात खुप मोठ्या प्रमाणात किडिंचा हाहाकार माजलाय, अकोला आणि आजूबाजूच्या परिसरात सोयाबीन आणि कपाशी पिकावरील रोगानी पार थैमान घातलाय.

अनेक भागात सोयाबीन पिकात करपा रोगाचे संक्रमण बघावयास मिळत आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना सोयाबीन पिकांकडून जास्तीच्या उत्पादनाची आशा असते. खुप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील शेतकरी कपाशी सोबतच सोयाबीन लागवडीला प्राधान्य देतात आणि कदाचित हेच कारण आहे की गेल्या काही वर्षात सोयाबीनची लागवड खुप मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसत आहे. परंतु करपा रोग जणू काही एवढ्या मोठ्या सोयाबीन लागवडीला आमवाशाचे ग्रहणच लावतोय.करपा रोगात सोयाबीनची पाने पिवळी पडतात आणि गळू लागतात.

वरुण राजाने पाठ फिरवताच सोयाबीन रागावला!

मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी खरीप हंगामात दीड लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात सोयाबीनची लागवड झाली.  दरम्यान, काही दिवसांपासून पाऊस नसल्याने सोयाबीन पिकांचेही नुकसान झाले. जेव्हा सोयाबीनची पिके चांगली फुलली होती, नेमका तेव्हाच बराच काळ पाऊस पडला नव्हता. यामुळे सोयाबीन पिकांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

 यावर बळीराजा काय म्हणतोय?

महाराष्ट्रातील सोयाबीन पिकाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की किडिंच्या आक्रमनामुळं बऱ्याच पिकाचे नुकसान होत आहे. विदर्भ दरवर्षी असतो त्यापेक्षा जास्तीचा दुष्काळाचा सामना करतोय, या दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, आणि म्हणुनच यंदा सोयाबीन उत्पादनात 25 टक्के घट होण्याची शक्यता आहे.

 

 

त्याचप्रमाणे अनेक भागात कपाशीच्या पिकांवर अळी आणि लाल्या रोगाचा प्रकोप दिसून येत आहे. लाल्या रोगामुळे पिकाची पाने लाल होतात. ज्यामुळे वनस्पती स्वतःच सुकू लागते. एकदा चांगला पाऊस झाला की पिकांना किडिंपासून दिलासा मिळू शकतो. कपाशीच्या पिकांवर अळी आणि लाल्या रोगाचा संसर्ग रोखला नाही तर कापसाचे उत्पादनही कमी होऊ शकते.

 महाराष्ट्राच्या विविध भागात सोयाबीनची लागवड

यावर्षी एकट्या अकोला तालुक्यात 49,914 हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड झाली आहे.  

 

 

 

त्याचप्रमाणे अकोटमध्ये 10,575 हेक्टर, तेल्हारामध्ये 12,505, बाळापूरमध्ये 19,210, पातूरमध्ये 27,540, बार्शीटाकळीमध्ये 34,928 आणि मूर्तिजापूर तालुक्यामध्ये 38,038 हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. सध्या शेतकरी सोयाबीन पिकावर विविध कीटकनाशके फवारण्यात गुंतले आहेत, जेणेकरून या किडिंचा व रोगांचा वाढता प्रादुर्भाव काही अंशी का होईना कमी होईल.

English Summary: attack on cotton and soyabion crop insect in maharashtra
Published on: 09 September 2021, 12:28 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)