Agripedia

Vermicompost: भारतात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच शेतात अनेक प्रकारच्या खतांचा वापर केला जातो. त्यातील काही खते तात्पुरती मर्यादित असतात तर काही जास्त काळ टिकणारी खते असतात. मात्र रासायनिक खतांचा वापर वाढल्याने जमिनीची सुपीकता कमी झाली आहे. त्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे गरजेचे बनले आहे.

Updated on 26 July, 2022 1:32 PM IST

Vermicompost: भारतात शेती (Farming) मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच शेतात अनेक प्रकारच्या खतांचा (Fertilizer) वापर केला जातो. त्यातील काही खते तात्पुरती मर्यादित असतात तर काही जास्त काळ टिकणारी खते असतात. मात्र रासायनिक खतांचा (Chemical fertilizers) वापर वाढल्याने जमिनीची सुपीकता कमी झाली आहे. त्यासाठी सेंद्रिय खतांचा (Organic fertilizers) वापर करणे गरजेचे बनले आहे.

सेंद्रिय शेतीमध्ये (Organic farming) वर्मी कंपोस्टला खूप महत्त्व आहे. कंपोस्ट खत हे मातीतील गांडुळांच्या मदतीने तयार केले जाते, जे कंपोस्टमधील सेंद्रिय पदार्थांचे विघटन करण्यास मदत करतात. त्यांच्या मदतीने सेंद्रिय खतामध्येही पोषक तत्वांचे प्रमाण अनेक पटींनी वाढते. यामुळे झाडांची वाढ तर होतेच, पण पिकात कीटक-रोग येण्याची शक्यताही कमी होते.

बहुतेक शेतकरी कंपोस्ट खत तयार करतात आणि सेंद्रिय शेतीमध्ये वापरतात, परंतु त्यांना त्याचा नेमका वापर आणि पिकाची अवस्था माहित नसते. काहीवेळा जास्त खत वापरल्यामुळे संसाधनांचा अपव्यय होतो, ते टाळण्यासाठी कोणते गांडूळ खत पिकाच्या आणि जमिनीच्या गरजेनुसार वापरावे.

भात आणि गहू पिकांमध्ये गांडूळ खताचा वापर

कृषी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गहू आणि धानामध्ये शेवटची नांगरणी करण्यापूर्वी गांडूळ खताचा वापर 20 क्विंटल प्रति एकर दराने करावा. त्यामुळे जमीन सुपीक बनते. तसेच जमिनीचा कस देखील वाढतो. त्यामुळे पेरणीनंतर पिकांची योग्यरीत्या वाढ देखील होते.

आता वाहणार दुधाची नदी! दूधउत्पादकांनो गाई-म्हशींना द्या हा हिरवा चारा, होईल भरघोस दुधवाढ

भाजीपाला पिकामध्ये वर्मी कंपोस्टचा वापर

भाजीपाला पिकापासून चांगले उत्पादन घेण्यासाठी गांडूळ खत 40 ते 50 क्विंटल प्रति एकर या प्रमाणात पेरणीपूर्वी किंवा लावणीपूर्वी आणि काही पिकांमध्ये माती टाकल्यानंतर द्यावे.

कडधान्य पिकात गांडूळ खताचा वापर

कडधान्य पिकापासून दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी, पेरणीपूर्वी सुमारे 15-20 क्विंटल प्रति एकर या प्रमाणात गांडूळ खत शेतात टाकावे, जेणेकरून जमिनीत सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा होऊ शकेल.

अरे व्वा! मोदी सरकारच्या या योजनेतून मिळतायेत दरमहा ५००० हजार, तुम्हीही असा घ्या लाभ...

तेलबिया पिकांमध्ये गांडूळ खताचा वापर

तेलबिया पिकांपासून अधिक तेल उत्पादन मिळविण्यासाठी, पेरणीपूर्वी जमिनीत 30-35 क्विंटल प्रति एकर या प्रमाणात गांडुळ खत टाकणे चांगले.

फळबागांमध्ये गांडूळ खताचा वापर

फळझाडांपासून फळांचे चांगले उत्पादन घेण्यासाठी प्रत्येक झाडाला वेळेवर खत आणि पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करणे गरजेचे असते. यासाठी 1-10 कि.ग्रॅ. गांडूळ खत प्रति झाड किंवा रोप वापरावे. त्यामुळे फळांचा आकारही वाढतो आणि फळाचा दर्जाही.

गांडूळ खताचे फायदे

संशोधनात असे आढळून आले आहे की गांडूळ खत पिकांची वाढ आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. शेतात पेरणीपूर्वी गांडूळ खत वापरल्यास बियांची उगवण जलद होते.

यामुळे पिकांचे वनस्पती संरक्षण होते आणि गुणवत्ता नियंत्रणासही मदत होते. गांडूळ खतामध्ये असलेले सेंद्रिय पदार्थ झाडांना आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा करण्याबरोबरच मातीची गुणवत्ता सुधारतात. त्याच्या वापराने भूगर्भातील पाण्याची पातळी चांगली राहते आणि जमिनीत पाणी बांधण्याची क्षमताही वाढते.

महत्वाच्या बातम्या:
एकच नंबर! शेतकऱ्यांनो गाई-म्हशींना टक्कर देत आहेत या शेळ्यांच्या जाती; जाणून घ्या...
शेतकऱ्यांनो वेळीच व्हा सावध! पिकांवर घोगावतोय ग्रास हॉपरचा धोका, त्वरित करा हे उपाय

English Summary: Add vermicompost to the field and double the yield
Published on: 26 July 2022, 01:32 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)