Agriculture Processing

आज शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. वर्षभर शेतात राबराब राबून देखील पाहिजे त्याचा मोबदला न मिळाल्यामुळे शेतकरी हताश होऊन चिंतेच्या गर्तेत स्वतःला फसवून घेतो आणि प्रसंगी काळाला आमंत्रण सुद्धा देतो. पण रुळलेल्या पाऊल वाटा सोडून शेतकरी आणि शेती पूरक व्यवसाय सुरू करण्यावर भर दिल्यास शेतकरीस्वतःचे भाग्य बदलू शकतो. सर्वच अन्नप्रक्रिया उद्योग हे शेतीमालावर अवलंबून आहे. अनेक प्रकारचे प्रक्रिया केलेल्या पदार्थांच्या निर्मितीसाठी शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनांची आवश्यकता असते. उदाहरणार्थ टोमॅटोपासून केचप, स्वास, लोणचे, पावडर. विविध फळांचा वापर करून जॅम, मार्मलेड, जेली, अनेक प्रकारचे पेय, क्रश, आर टी एस इत्यादी. फळांपासून फ्रूट चीज, फ्रुट टॉफी, फ्रुट लेदर वाळवलेल्या भाज्या, इत्यादी आजच्या काळात सर्वच खूप वेळ वाचवून अधिक काम करण्याच्या मागे असतात.

Updated on 18 June, 2021 11:49 AM IST

 आज शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. वर्षभर शेतात राबराब राबून देखील पाहिजे त्याचा मोबदला न मिळाल्यामुळे शेतकरी हताश होऊन चिंतेच्या गर्तेत स्वतःला फसवून घेतो आणि प्रसंगी काळाला आमंत्रण सुद्धा देतो. पण रुळलेल्या पाऊल वाटा सोडून शेतकरी आणि शेती पूरक व्यवसाय सुरू करण्यावर  भर दिल्यास शेतकरीस्वतःचे भाग्य बदलू शकतो. सर्वच अन्नप्रक्रिया उद्योग हे शेतीमालावर अवलंबून आहे. अनेक प्रकारचे प्रक्रिया केलेल्या पदार्थांच्या निर्मितीसाठी  शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनांची आवश्यकता असते. उदाहरणार्थ टोमॅटोपासून केचप, स्वास, लोणचे, पावडर. विविध फळांचा वापर करून जॅम, मार्मलेड,  जेली, अनेक प्रकारचे पेय, क्रश, आर टी एस इत्यादी. फळांपासून फ्रूट चीज, फ्रुट टॉफी, फ्रुट लेदर  वाळवलेल्या भाज्या, इत्यादी आजच्या काळात सर्वच खूप वेळ वाचवून अधिक काम करण्याच्या मागे असतात.

 कामाचा वाढता व्याप, अपूर्ण वेळ, वेळेची बचत, कमी श्रम यामुळे इन्स्टंट किंवा कमी श्रमात बनवता येण्यासारखा अन्नपदार्थांनाबाजारात खूप मागणी आहे.भारतात एमटीआर, किसान, डाबर, गिट्स अशा अनेक ब्रांडस ने अनेक वर्षापासून आपले स्थान निर्माण केले आहे. इन्स्टंट म्हणजे  लगेच बनवता येण्यासारखे. म्हणूनच शेतकऱ्यांनी उपलब्ध असलेल्या कृषी मालावर  आधारित प्रक्रिया उद्योग करून लोकांना इन्स्टंट फूड  उपलब्ध करून दिल्यास त्यातून तुलनात्मक मोबदला मिळून चांगले उत्पन्न मिळू शकते. जर शेतकरी फक्त धान्याचे उत्पन्न घेत असेल तर स्वच्छ धान्याचे रेडी पॅकेट्स, वेगवेगळ्या धान्यांची पिठे, मिश्रित धान्याची पीठ,ज्याला मल्टि ग्रेन्स म्हणून खूप मागणी आहे. अशा लहान मोठ्या पॅक साइज  मध्ये लोकांना उपलब्ध करून दिल्यास अधिक नफा मिळवता येणे शक्य आहे. म्हणूनच आपण आज आपण मार्केटमध्ये रुचिरा, शुभान्न या कंपन्यांच्या अनेक प्रकारचे पीठ जसे शिंगाडा पीठ, राजगिरा पीठ, साबुदाणा पीठ, भगर पीठ, ज्वारीचे पीठ, बाजरीचे पीठ, इत्यादी  विक्रीसाठी उपलब्ध असलेले पाहतो.

 शिवाय शहरी लोकांना ब्रेड, बिस्किट, कुकीज, नूडल्स, फ्लेक्स याशिवाय आहार ते  जुमानत नाहीत आणि हे सर्व पदार्थ मैदा क्वेरीज बनत नाहीत. पण जर विविध धान्याच्या पिठाचा अंतर्भाव करून निर्मिती करून या पदार्थांचा लघु उद्योग सुरू करून देखील शेतकरी खुप मिळकत मिळू शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी थोडा पुढाकार घेऊन एखाद्या तज्ञाचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. आज महिला देखील खूप मोठ्या प्रमाणात घराबाहेर कार्यरत आहेत त्यात रोजचे दोनवेळचे जेवण बनवणे सुद्धा काम करणाऱ्या स्त्रीला जिकिरीचे वाटते. अशा महिलांसाठी अनेक प्रकारचे रेडी टू कूक  किंवा थोडा त्रास कमी करू शकतील अशा पदार्थांची खूप मागणी होताना दिसते. म्हणूनच शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या भाज्यांसाठी लागणाऱ्या विशिष्ट मसाला जसे पाव भाजी मसाला, छोले मसाला, बिर्याणी मसाला, विविध मसाल्याची पावडर, धने पावडर, हळद पावडर, जिरे पावडर, जायफळ पावडर, साधे आले लसूण वाटण या पदार्थाच्या निर्मितीतून उत्पन्न वाढवता येऊ शकते.

 एवढेच नव्हे तर काही मिठाई, नाश्त्याचे पदार्थ बनवायला अवघड आणि खूप वेळ खाणारे असतात  त्यात जिलेबी, रसमलाई, गुलाब जामून, कुकी केक किंवा नाश्त्यासाठी इडली, ढोकळा, प्रोटीन केक असे पदार्थ त्वरित बनत नाहीत आणि बाहेरून आणलेले खिशाला परवडत असले तरी शारीरिक दृष्ट्या त्या महिलांना करूच वाटत नाही.

असे खूप प्रकारातील मिठाईची  आणि नाष्टा तले पदार्थ सुद्धा एक लघुउद्योग म्हणून शेतकऱ्याने जरूर करायला हरकत नाही. सुप हा सुद्धा एक पौष्टिक पदार्थ अनेक आरोग्य प्रती सजग लोक रोजच्या आहारात घेतात. मार्केट मधून उपलब्ध असलेले सुप मध्ये पिष्टमय पदार्थ असतात. परंतु रेडी टू कूक सूप्स मध्ये जर वाळवलेल्या भाज्या आणि काही कडधान्य आने मूल्यवर्धित करून पौष्टिक पदार्थ रेडी टू कूक सूप्स चे पॅकेट सुद्धा मोठी बाजारपेठ काबीज करू शकतो..

 रोजच्या रोज असे अनेक पदार्थ आहेत ते बनवायला खूप वेळ आणि कष्ट लागतात. म्हणून  सुद्धा लोक युवा महिला कंटाळा करतात. या बाबींना विचारात घेऊनच जर शेतकऱ्यांनी असलेल्या उत्पादनाचा वापर इंस्टंट फूड बनवण्यावर भर दिला तर शेतीतून अधिक फायदा नक्की मिळेल.

English Summary: instant food processing
Published on: 18 June 2021, 11:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)