Agriculture Processing

भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारतातील शेतकरी नवनवीन पिके घेऊन चांगले उत्पादन घेत असतात. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत कृषी उत्पादने बाबतीत भारत हा स्वावलंबी बनत चालला आहे.

Updated on 12 October, 2022 10:41 AM IST

भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारतातील शेतकरी नवनवीन पिके (crops) घेऊन चांगले उत्पादन घेत असतात. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत कृषी उत्पादने (Agricultural products) बाबतीत भारत हा स्वावलंबी बनत चालला आहे.

रब्बी हंगामात शेतकरी कडधान्य पिकातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकतात. या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्याने जर मुख्य कडधान्य पीक मसूराची मिश्र (mixed farming) शेती केली तर मसूर शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळवून देऊ शकतो.

शेतकरी मोहरी किंवा इतर पिकांसोबत मसूरची पेरणी करू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मसूर लागवडीसाठी वेगळा खर्च करावा लागणार नाही. दुहेरी पिके घेऊनही शेतकरी दुप्पट नफा कमवू शकतात.

मसूर लागवड

मसुराची लागवड फक्त रब्बी हंगामात केली जाते. मसूराच्या शेतीतून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या दरम्यान मसूराची पेरणी करावी.

हलकी चिकन माती मसुराच्या लागवडीसाठी सर्वात योग्य पर्याय आहे. त्याचबरोबर शेतकरी लाल लॅटराईट जमिनीतही मसूर पेरू शकतात. मसूर पेरणीसाठी मुख्यतः सेंद्रिय पद्धतीचा वापर करावा. इतर पिकांप्रमाणे मसूराच्या उत्पादनात माती आणि हवामान खूप महत्त्वाची बजावतात. त्यामुळे मातीचे pH मूल्य 5.8-7.5 या दरम्यान असावे.

रब्बी हंगामासाठी 9 लाख टन खतांची मागणी; शेतकऱ्यांना होणार फायदा

मसूर पिकाच्या लागवडीसाठी हेक्टरी 30 ते 35 किलो बियाणे लागते. चांगल्या उत्पादनासाठी बियाणांवर पेरणीपूर्वी 5 ग्रॅम रायझोबियम कल्चर आणि 5 ग्रॅम स्फुरद जिवाणू PSB कल्चर ची प्रक्रिया करून त्यांना सावलीच्या जागी वाळवून दुसऱ्या दिवशी बियाणे ड्रिल मशीनच्या साह्याने पेरा.

कडधान्य पिकांच्या लागवडीमध्ये माती परीक्षण करून त्यावर आधारित खतांचा वापर करणे अधिक चांगले असते. त्याचबरोबर शेतकरी मसूरच्या चांगल्या उत्पादनासाठी गांडूळ खत, शेणखत, आणि सेंद्रिय खतांचा देखील वापर करू शकता.

पोस्ट ऑफिसच्या ग्राम सुमंगल योजनेत 170 गुंतवा आणि मिळवा 19 लाख रुपयांचा परतावा

या पिकाला पहिले पाणी पेरणीनंतर 45 दिवसांनी म्हणजेच खुरपणीच्या वेळी द्यावे लागते. तर दुसरे पाणी शेंगा तयार होण्याच्या वेळी म्हणजेच पीक पेरणीनंतर 70 ते 75 दिवसांनी द्यावे.

मसूर पिकाची योग्य मशागत (Cultivation) करून योग्य हवामानाखाली पेरणी केल्यास 110 ते 140 दिवसात हेक्टरी 20 ते 25 क्विंटल पर्यंत धान्याचे उत्पादन मिळू शकते. त्याचबरोबर मसूर पिकापासून जवळजवळ 30 ते 35 क्विंटल जनावरांचा चारा देखील तयार होतो.

महत्वाच्या बातम्या 
शेतकऱ्यांनो पिकांच्या पेरणीपूर्वी हे एक काम करा; खर्चामध्ये मोठी बचत होईल
मेष राशीने अनोळखी व्यक्तींपासून सावध राहा; जाणून घ्या संपूर्ण राशीचे राशीभविष्य
शेतकऱ्यांनो सावधान! नांदेड जिल्ह्यात लम्पीमुळे 27 जनावरांचा मृत्यू

English Summary: Farmers should cultivate lentil mixed farming income 110 days
Published on: 12 October 2022, 10:34 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)